राज्यातील १९२ साखर कारखान्यांकडून तब्बल ५६४.३३ लाख टन उसाचे गाळप

मुंबई –  महाराष्ट्रात (Maharashtra) गळती हंगाम २०२१-२२ मध्ये ११ जानेवारी २०२२  पर्यंत तब्बल १९२ साखर कारखाने (Sugar factory) उसाचे गाळप सुरू. राज्यातील साखर उत्पादनात चांगलीच वाढ झाली आहे. तर ९७ खासगी व ९५ सहकारी तसेच साखर कारखान्यांचा (Sugar factory) समावेश आहे. आतापर्यंत राज्यात १९२ साखर कारखान्यांकडून ५६४.३३ लाख टन उसाचे गाळप (Sugarcane flour) करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात (Maharashtra) ११ जानेवारी २०२२  पर्यंत तब्बल ५५५.५२ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन  झाले आहे. अशी माहिती आयुक्तालयाकडून मिळाली आहे, तर  यामुळे राज्यातील साखर उताऱ्यात चांगली वाढ झाली असून आता महाराष्ट्राचा सरासरी साखर उतारा ९.८४  टक्के इतका आहे.

तर राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तब्बल १३४ लाख ७६ हजार लाख टन उसाचे गाळप (Sugarcane flour)झाले आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये १५० लाख ६८ हजार लाख क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील साखर उतारा ११.१८ टक्के आहे.

महत्वाच्या बातम्या –