मुंबई : राज्यात आज मुसळधार पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. हवामान खात्याने पुढील 24 तासांत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. अनेक भागात पाऊस होत असल्याने पुढचे 24 तासांत अतिमुसळधार पाऊस होत असल्याचे दिसत आहे.
तर पूर्व राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या काही भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे हा पाऊस होणार आहे. त्यामुळे राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात या भागांमध्ये यलो अलर्ट देण्यात आलाय. तर राज्यातील पुणे, सातारा, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, जालना, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, लातूर, नांदेड, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाने विश्रांती घेतली होती. यानंतर पुन्हा एकदा पाऊस जोरदार कमबॅक करेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान खात्याने आज पुढील २४ तासांसाठी राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या –
- मंत्रिमंडळ बैठकीतील मोठे निर्णय : दि. २२ सप्टेंबर २०२१
- सावधान! पुढील २८ तासांसाठी राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार
- प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत सुधारणा सुचविण्यासाठी समिती स्थापन करावी – दादाजी भुसे
- मंत्रिमंडळ मोठा निर्णय: ‘या’ जिल्ह्यात साखर संग्रहालय उभारणार
- राज्यातील ‘या’ भागात पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस पडणार; हवामान खात्याचा इशारा