पुणे – दहावी तसेच बारावी या परीक्षा(Examination) विद्यार्थ्यांच्या(Student) आयुष्यातील निर्णायक परीक्षा असतात. त्यात दहावी आणि बारावीची परीक्षा(Examination) मार्च महिन्यात होणार आहे. परंतु हि परीक्षा पुढे ढकलण्याचे संकेत मिळत आहे. कारण शिक्षण उपसंचालक आणि शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांची ऑनलाईन बैठक सुरु असताना. ‘मार्च महिन्यात होणारी दहावी बारावीची परीक्षा एप्रिल महिन्यात घ्यावी.’ अशी सुचना राज्यमंत्री बच्चू कडू यांनी बैठकीत दिली. ह्या बैठकीत आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत शिक्षणाधिकारी, शिक्षण विभागाचे अधिकारी तसेच गट शिक्षणाधिकारी उपस्थित होते. तसेच दहावी बारावीच्या लेखी, प्रात्यक्षिक आदी परीक्षा यांची तयारी, नियोजन आदींचा आढावा घेतला
कोरोना संकटांमुळे शाळा बंद आहेत,मुलांचा अभ्यास व लिखाणाचा सराव झालेला नाही अश्यात मुलांचा लिखाणाचा सराव नसल्याने त्यांना परीक्षेत(Examination) अडचण निर्माण होईल. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे(Student) लसीकरण खूप कमी प्रमाणात झाले असल्याने कोरोनाचा धोका हि लक्षात घेणे गरजचे आहे. त्याचबरोबर ऑनलाईन ऑफलाईन गोंधळांमुळे विद्यार्थीही(Student) संभ्रमात आहे. विद्यार्थ्याचे झालेले लसीकरण याची माहिती घेतल्यानंतर शिक्षण विभागाने(Department of Education) या परीक्षा यांच्या नवीन प्रकारे नियोजन करण्याच्या सूचना मंडळाला दिल्या आहेत.
त्यामुळे ‘राज्य शिक्षण मंडळ लेखी परीक्षा आणि त्याचे वेळापत्रक बदलण्याची शक्यता निर्माण(Possibility creation) झाली आहे.’
महत्वाच्या बातम्या –
- Budget २०२२: शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अर्थसंकल्पात मोठी घोषणा
- ‘वाईन विक्री’ मुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनाला भाव मिळेल, त्यांची आर्थिक स्ति
- मंत्रिमंडळ मोठे निर्णय : दि. २७ जानेवारी २०२२
- थंडीच्या दिवसात पपई खाणं शरीराला घातक
- चांगली बातमी – देशातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट; गेल्या २४ तासात ‘इ