मुंबई – राज्यात कोरोनाचा कहर(Corona’s havoc) आणि त्यात विद्यार्थ्यांना व पालकांना शाळा बंद चालू होत असल्याने संभ्रम(Confusion) निर्माण होत होता. परंतु महारष्ट्रात कोरोना रुग्ण हे कमी प्रमाणात असून रिकव्हरी रेट हि खूप चांगला असल्यामुळे परीक्षा होण्याबाबत जो संभ्रम होता तो आता नाहीसा झाला आहे त्याबात रविवारी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी खुलासा केला.
शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाले कि ‘ कोरोनाचा पादुर्भाव कमी असून राज्यात होणारी दहावी बारावीची परीक्षा हि ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होईल. तसेच परीक्षांबाबत अफवा पसवरल्या जात असून कोणी हि अफवांवर विश्वास ठेवू नये. ज्या तारखेला परीक्षा वेळापत्रकात(In the schedule) दिल्या आहे त्याच तारखेला आम्ही घेण्याचा प्रयत्न करत आहोत.
महाराष्ट्रातील सरकार आणि शिक्षण विभाग हे १५ फेब्रुवारी पर्यंत कोरोनाच्या स्थितीवर लक्ष ठेवून आहे. त्यांनतरच निर्णय घेतला जाईल तो पर्यंत कसला हि तारखांबाबत बदल होणार नाही. हे त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रातील बारावीची परीक्षा हि ४ मार्च पासून तर दहावीची परीक्षा हि १५ मार्च पासून सुरु होणार आहेत.
महत्वाच्या बातम्या –
- सतर्क राहा! राज्यातील ‘या’ ९ जिल्ह्यांमध्ये दोन दिवस जोरदार पावसासह गारपी
- थंडीचा कडाका वाढणार : पुढील 24 तासात राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये थंडी
- “शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांना आता गांजा पिकवण्या
- सावधान! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता; हवामान वि
- सावधान! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता; हवामान वि