मुंबई – महाराष्ट्र सरकार(State Goverment) नेहमीच गोरगरिबांच्या हितासाठी कोणत्या ना कोणत्या योजना राबवत असते. सरकारने आता ‘माझी कन्या भाग्यश्री’ ही योजना सुरू केली आहे. ही योजना मुलींचे कमी झालेले प्रमाण वाढवण्यासाठी आणि महीला शिक्षणाला चालना देण्यासठी राबवण्यात येत आहे. या योजनेंतर्गत राज्यातील ज्या पालकांनी मुलीच्या जन्मानंतर 1 वर्षाच्या आत नसबंदी केली, त्यांना शासनाकडून 50,000 रुपये रक्कम दिली जाईल. आणि दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाचा अवलंब केला, तर नसबंदी केल्यानंतर दोन्ही मुलींच्या नावावर सरकार २५-२५ हजार देईल.
या योजनेचा फायदा एका कुटुंबातील दोन मुलींना दिला जाईल. महाराष्ट्रातील जास्तीत जास्त कुटुंबाना या योजनेचा लाभ मिळावा म्हणून सरकारने कुटुंबाच्या वार्षिक उत्प्नानाची मर्यादा १ लाख रुपयांवरून ७.५ लाख रुपये केले आहे.
आवश्यक कागदपत्रे – अर्जदाराचे आधारकार्ड,आईचे किंवा मुलीचे बँक खाते पासबुक, उत्पनाचा दाखला, पासपोर्ट फोटो, मोबाईल नंबर
अर्ज करण्यासाठी, महाराष्ट्र सरकारच्या www.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट दया. नंतर भाग्यश्री योजनेचा फॉर्म डाउनलोड करा. फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरा.
महत्वाच्या बातम्या –
- राज्यात पुन्हा मास्क सक्ती ?;जाणून घ्या बैठकीत नेमक काय झालं ?
- मराठवाड्याच्या केशर आंब्याला कोकणात पसंती मिळावी अशी अपेक्षा फलो
- राज्यात ‘संत्रा’ फळपिकासाठी विमा योजना ; जाणून घ्या प्रक्रिया !
- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ; पगारात होणार वाढ…!
- राज्यात मुलींच्या सुरक्षतेसाठी, होमगार्डची मेगा भरती होणार !
- मोठी भरती – ‘५६३६’ जागांसाठी सरकारी नोकरी, १ जून पासून अर्जप्रक्रिया