नवी दिल्ली – येणाऱ्या अर्थसंकल्पात (Budget) शेतकऱ्यांसाठी कोणत्या घोषणा होणार याकडे आता सगळ्या शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे देशातील शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट आले आहे. तसेच खतांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहे. यामुळे आता शेती करायची तरी कशी असा प्रश्न उपस्थितीत केला जात आहे. यामुळे आता आगामी केंद्रीय अर्थसंकल्पाकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यासाठी आता काही दिवसच शिल्लक राहिले आहेत.
केंद्रातील मोदी सरकार शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्प 2022 मध्ये काही मोठ्या घोषणा करण्याची शक्यता आहे. बदलत्या बाजारपेठेनुसार शेतकऱ्यांना तयार करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, जेणेकरून त्यांना जास्तीत जास्त फायदा मिळू शकेल. अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यादरम्यान, मूल्यवर्धनाला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी अर्थसंकल्प 2022 मध्ये गुंतवणुकीची घोषणा केली जाऊ शकते. यासोबतच, या कामासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम देण्याची घोषणाही होण्याची शक्यता आहे.
येत्या 1 फेब्रुवारी 2022 रोजी मोदी सरकारच्या दुसर्या कार्यकाळातील चौथा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करणार आहेत. यामध्ये आता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकर्यांना देण्यात येणार्या वार्षिक रकमेत वाढ होऊ शकते. पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत मोदी सरकार शेतकर्यांना वार्षिक 6,000 रुपये देते. आता या बजेटमध्ये ही रक्कम वाढवली जाऊ शकते. यामुळे सगळ्या शेतकऱ्यांचे याकडे लक्ष लागले आहे.
पीएम किसान (PM Kisan) सन्मान निधी योजनेंतर्गत मोदी सरकार शेतकर्यांना वार्षिक 6,000 रुपये देते मात्र आता ही रक्कम आता ८००० एवढी केली जाऊ शकते. देशात सध्या महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तर देशातील शेतकर्यांचा शेतीचा खर्च वाढला आहे. डिझेल ते खते आणि बियाणांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक शेतकरी चिंतेत आहे. तसेच शेतकऱ्यांवर अनेक नैसर्गिक संकटे येत आहेत. यामुळे याबाबत मोदी सरकार विचार करत असल्याचे सांगितले जात आहे.
यंदा सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना कमी व्याज दरावर कर्ज, शेती क्षेत्रासाठी नवतंत्रज्ञान, कृषी पायाभूत सुविधा, वेगवेगळी पिके, यूरिया वरील अवलंबित्व कमी करणे या सारख्या मुद्द्यावर निर्णय होईल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.
महत्वाच्या बातम्या –
- सतर्क राहा! ‘या’ भागात पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज
- थंडीची हुडहुडी; राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पडणार जोरदार थंडी
- थंडीचा कडाका! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये दोन दिवस थंडीची लाट कायम राहणार
- मोठी बातमी : राज्यातील दहावी – बारावीची होणारी परीक्षा पुढे ढकलणार ?
- नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पासाठी ६०० कोटी – दादाजी भुसे