थंडीची हुडहुडी; राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये २ ते ३ दिवस थंडी वाढणार

थंडीचा कडाका

मुंबई –  हवामान Weather विभागाचा अंदाज  पुढील २ ते ३ दिवस राज्यात थंडीचा कडाका वाढणार आहे अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानात मोठी घट झाली आहे. राज्यातील  मुंबई भागात आज १४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर राज्यातील नाशिक, पुणे आणि औरंगाबाद जिल्ह्यांमध्ये  25 अंशाखाली कमाल तापमान नोंदवल्या गेलं आहे. तर  धुळीच्या वादळाचा परिणाम देखील दिसून आला. मुंबईसोबतच राज्यातील  अनेक भागात पश्चिमी चक्रवातामुळे २ तीन ते ३ दिवस तापमानात घट होईल असा अंदाज हवामान विभागाने दिली आहे.  पुढच्या काही दिवसांमध्ये पारा आणखी खाली घसरणार असून थंडीची लाट येणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भ, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागांमध्ये पुढील काही दिवस थंडीचा कडाका मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.  मुंबईत आज अधिक तापमान २९ तर किमान तापमान १४ अंश सेल्सिअस राहील. तर राज्यातील पुणे जिल्ह्यात किमान तापमान २६ तर कमाल तापमान १२ अंश आहे. नागपूरमध्ये किमान तापमान २५ तर कमाल तापमान ९ डिग्री राहील अशी शक्यता आहे. नाशिकमध्ये २४ डिग्री कमाल तर ६ डिग्री किमान तापमान राहील. औरंगाबादमध्येही अशीच स्थिती राहील.

महत्वाच्या बातम्या –