राज्यात पुन्हा थंडीची लाट येणार; हवामान खात्याचा अंदाज

थंडी

मुंबई –  राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा थंडीचा कडाका  जास्त आहे. मुंबईत सहसा थंडी नसते मात्र अवकाळी पाऊस पडल्यामुळे तापमानात कमालीची घट झाली आहे.राज्यात या महिन्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे,  हवामान (Weather) विभागाने दिलेल्या अंदाजानुसार ७,८,९ जानेवारीला राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसासह गारपिटीने हजेरी लावली आहे, त्यामुळे राज्यात थंडी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

पुढील ३ ते ४ दिवस राज्यात थंडीचा कडाका वाढणार आहे अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानात मोठी घट झाली आहे. राज्यातील  मुंबई भागात 16 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर राज्यातील नाशिक, पुणे आणि औरंगाबाद जिल्ह्यांमध्ये  25 अंशाखाली कमाल तापमान नोंदवल्या गेलं आहे. तर  धुळीच्या वादळाचा परिणाम देखील दिसून आला. मुंबईसोबतच राज्यातील  अनेक भागात पश्चिमी चक्रवातामुळे पुढील तीन ते चार दिवस तापमानात घट होईल असा अंदाज हवामान विभागाने दिली आहे.  पुढच्या काही दिवसांमध्ये पारा आणखी खाली घसरणार असून थंडीची लाट येणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येणार्‍या पुढच्या पाच दिवसात उत्तर पश्चिम आणि मध्य भारताच्या बहुतांशी भागामध्ये किमान तापमानात तीन ते पाच अंशांनी घट होण्याची शक्यता आहे तर 25 आणि 26 जानेवारी रोजी उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या –