गंगाखेड : अतिवृष्टीत शेतकऱ्यांच्या पिकांची पार माती झाली, त्यांच्यावर अस्मानी संकट तर ओढवलेच आहे पण प्रशासनाचे सुलतानी संकट ओढावू नये यासाठी नुकसानीचे पंचनामे योग्य झाले पाहिजेत, खोटे पंचनामे सहन केले जाणार नाहीत अन्यथा त्यासाठी रस्त्यावर उतरू असा सज्जड इशारा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी दिला. सरकारने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी अशी मागणीही त्यांनी केली. अतिवृष्टीची पाहणी करून आल्यानंतर गंगाखेड जि. परभणी येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.
मराठवाडयात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील उभ्या पिकांची पार माती झाली आहे, अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठिशी सरकारने उभे राहिले पाहिजे. सरकारने बोलायचे एक आणि करायचे एक असे वागू नये. नुकसानीचे खरे पंचनामे करावेत, खोटे पंचनामे केल्यास रस्त्यावर उतरून त्याची होळी करू असा इशारा त्यांनी दिला. तुम्ही विरोधी पक्षात असताना जेवढी मदत शेतकऱ्यांसाठी मागत होता, तेवढी मदत आता करा असे सत्ताधाऱ्यांना उद्देशून त्या म्हणाल्या. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत न दिल्यास आंदोलन करण्याचा इशाराही पंकजा मुंडे यांनी यावेळी दिला.
अन् पंकजाताईंना पाहताच शेतकऱ्यांना आला धीर !
नांदेडचा दौरा आटोपून पंकजा आपल्या भेटीसाठी येणार असल्याचे समजताच गंगाखेड येथे हजारो शेतकरी त्यांची आतुरतेने वाट पहात होते. पंकजा मुंडे यांचे आगमन झाले आणि त्यांना पाहताच उपस्थित शेतकऱ्यांना मोठा धीर आला. पंकजाताई यांनी यावेळी अतिशय आपुलकीने त्यांच्या वेदना जाणून घेतल्या व मदतीचे आश्वासन दिले
महत्वाच्या बातम्या –
- ‘हा’ साखर कारखाना 27 ऑक्टोबरपासून सुरु होणार
- राज्यात ‘या’ ठिकाणी पावसाचा जोर राहणार
- सर्वशक्तीपणाला लावून शेतकऱ्यांना पुन्हा उभे करणार – उद्धव ठाकरे
- ‘या’ जिल्ह्याच्या शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला राज्यातील नेते कधी येणार ?