औरंगाबाद-तालुक्यात तात्काळ शासकीय कापूस व भरड धान्य खरेदी केंद्र सुरु करुन शेतक-यांची व्यापायांकडून होणारी लुट त्वरीत थांबवावी, अशी मागणी फुलंब्री कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संदीप बोरसे यांनी केली आहे. याविषयी बोरसे यांनी तहसीलदार संगीता चव्हाण यांना निवेदन दिले.कापूस व मका खरेदी हंगाम २०१७-१८ सुरु झालेला आहे. फुलंब्री तालुक्यात बर्यापैकी कापूस व मका पिकाचे उत्पादन झालेले आहे. काही दिवसातच या पिकांची बाजारपेठेत आवक वाढणार आहे. त्यासाठी शासनाच्या वतीने शासकीय भरड धान्य खरेदी केंद्र सुरु करण्यात यावे. शासकीय भरड धान्य केंद्र सुरु झाल्यास शेतकर्यांच्या पदरात शासनाच्या हमी भावाची रक्कम पडेल अन्यथा अशीच स्थिती राहिल्यास व्यापा-यांकडून शेतक-यांची लूट होण्याची शक्यता आहे. याकरीता शासकीय कापूस व भरड धान्य केंद्र सुरु करण्याबाबत कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाव्दारे सभापती बोरसे यांनी केली आहे.
शासकीय कापूस खरेदी केंद्रे ताबडतोब सुरू करा; बाजार समिती सभापतींची मागणी
1 Min Read
October 26, 2017
You may also like
Recent Posts
- कुठल्याही परिस्थितीत जनतेला निकृष्ट धान्य वितरण होता कामा नये, अन्नधान्य वितरणावर काटेकोरपणे लक्ष द्यावे – छगन भुजबळ
- मंत्रिमंडळ निर्णय: राज्य परिवहन महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी शासकीय विभागांच्या माल वाहतुकीची परवानगी
- मोठी बातमी – उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार कडक लॉकडाऊनची घोषणा
- मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारने घेतला दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय
- मधमाश्यांनी चावा घेतल्यावर काय उपाय करावे ?जाणून घ्या