सांगली शहराला महापुराचा मोठा फटका ; 31 हजार नागरिकांचे, तर 4 हजार जनावरांचे स्थलांतर

सांगली शहराला महापुर

सांगली शहराला या महापुराचा मोठा फटका बसला आहे. सांगली शहर आणि उपनगरामध्ये महापुराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे सांगली शहर जलमय बनले आहे. सांगली जिल्ह्यातल्या कृष्णा आणि वारणा नद्यांना महापूर आलेला आहे. मुसळधार पाऊस आणि त्याचबरोबर कोयना व चांदोली धरणातून मोठ्या प्रमाणावर सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे, दोन्ही नद्यांनी रौद्र रूप धारण केले आहे. दोन्ही नद्यांना आलेल्या महापुरामुळे नदीकाठच्या शेकडो गावांसह सांगली शहराला मोठा फटका बसला आहे.

नदीकाठी असणाऱ्या सुमारे 31 हजार नागरिकांचे, तर 4 हजार जनावरांचे स्थलांतर करण्यात आले आहे. तर पाण्याची पातळी वाढत असल्याने अनेक गावांना पुराचा वेढा पडत आहे. त्यामुळे, सांगली जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक (एनडीआरएफ) दाखल झाले असून, नदीकाठच्या गावांमध्ये बचावकार्य सुरू आहे. शिरगाव ,कसबे डिग्रज येथे एनडीआरएफने सुमारे 100 हून अधिक नागरिकांची पुराच्या पाण्यातून सुटका केली आहे.

महत्वाच्या बातम्या –

पुढच्या तीन दिवसात मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता – अंदाज हवामानखात्याचा

‘पाणी पुरवठ्यात अडचण येत असेल तर मला सांगा, आज सरकार मीच आहे’

पूरग्रस्त भागात आरोग्य सेवेसाठी १६२ वैद्यकीय पथके कार्यरत – एकनाथ शिंदे