सोमवारपासून राज्यात ढगाळ हवामानासह पावसाची उघडीप राहणार असल्याचं हवामान खात्याने संगितलं आहे. त्यामुळे परतीच्या मॉन्सूनला माघार घेण्यासाठी पोषक वातावरण तयार होत असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे. राज्यातील पावसाचा जोर कमी शकतो. एक -दोन दिवसात राज्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पाऊस पडणार आहे. सोमवारपासून ढगाळ हवामानासह पावसाची उघडीप राहणार आहे.
त्यामुळे परतीच्या मॉन्सूनला माघार घेण्यासाठी पोषक वातावरण तयार होत असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे. गेल्या तीन ते चार दिवसापुर्वी अरबी समुद्राच्या पश्चिममध्य भागात चक्रिय वाऱ्याची स्थिती तयार झाली होती. ती स्थिती अजूनही कायम आहे. त्याचा परिणाम कोकण व महाराष्ट्रातील काही भागावर होत असल्याने तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
आज (शनिवार) ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. उद्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, पुणे , कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. तर मराठवाडा काही अंशी ढगाळ हवामान राहणार असून विदर्भात पावसाची उघडीप राहिल. सध्या राज्यातील काही भागात ऊन पडत आहे, त्यामुळे उकाड्यात वाढ झाली आहे. परिणाणी कमाल तापमानात वाढ झाली आहे. दरम्यान जळगाव येथे ३५.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
महत्वाच्या बातम्या –
- शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी; आता राज्य सरकार कृषी यांत्रिकीकरणासाठी देणार अनुदान, त्यामुळे लवकर करा अर्ज
- राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पुढील २४ तासात मुसळधार पावसाची शक्यता
- राज्यात पुढील २ दिवस जोरदार पावसाची शक्यता; ‘या’ ठिकाणी आँरेज अलर्ट
- अंडी का खावीत ? जाणून घ्या फायदे