मुंबई – राज्यात संततधार कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने दिली आहे. तर २४ व २५ तारखेला बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असल्याने येत्या काही दिवसात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने जारी केला आहे. त्यामुळे आज रायगड, रत्नागिरी आणि पालघरला ऑरेंज अलर्ट दिला असून राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे उत्तर कोकणाला ऑरेंज अलर्ट जरी करण्यात आला आहे.
मराठवाड्यातही संततधार सुरुच राहणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. याशिवाय विदर्भातही पावसाचा जोर वाढला असून धरणांतील पाणी साठ्यात वाढ झाली असून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या –
- पुढच्या काही तासात राज्यात जोरदार पाऊस पडणार; हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा
- ‘या’ जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता; हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा
- सावधान! राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता
- मुख्यमंत्र्यांनी शब्द दिल्याप्रमाणे २५ वर्षानंतर प्रथमच एका वर्षात जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
- राज्यातील ‘या’ भागात पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस पडणार; हवामान खात्याचा इशारा