‘इथेनॉल’ हे हरित इंधन ते थेट पंपावर विकल्यास शेतकऱ्यांना फायदा होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

नितीन गडकरी

पुणे –      दिनांक ०४ रोजी वसंतदादा साखर इन्स्टिट्यूट(Vasantdada Sugar Institute)  मांजरी मुख्यालयात दोन दिवस साखर परिषद सुरु आहे. त्यात प्रमुख पाहुणे म्हणून नितीन गडकरी(Nitin Gadkari) केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री उपस्थित होते. कार्यक्रमात ते म्हणले कि ‘ भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियनपर्यंत नेण्यासाठी केंद्र सरकार आत्मनिर्भर भारताची घोषणा केली व त्यासाठी काम करत आहे.

शेतकऱ्यांचे उसाचे दर कमी नाहीत ते वाढत राहतील परंतु साखरे दर कमी होऊ शकतात, अश्यावेळी कारखानदार अडचणीत येऊ नये साखळी सुळळीत चालावी त्यासाठी इथेनॉल हे इंधन मुख्य राहील, इथेनॉल इंधन हे हरित इंधन असल्यामुळे ते थेट पंपावर विकायला सुरवात झाली तर शेतकऱ्यांना ह्याचा मोठा फायदा होणार आहे. त्यासाठी आम्ही पुणे जिल्ह्यात प्रथमतः तीन पंप उभारणार आहोत, येथे बरेच मंत्री बसलेत सर्वानी पुढाकार घ्यायला हवा तसेच केंद्राने सुद्धा शेतकऱ्यांचा विचार करत पेट्रोल मध्ये २०२५ पर्यंत इथेनॉल मिश्रण प्रमाण २० टक्के करण्याचे धोरण आहे. त्यासाठी आपल्यलाला किमान एक हजार कोटी लिटर इथेनॉल लागणार आहे तितकी उत्पादन क्षमता साखर कारखान्यांमध्ये नाही ते उपलब्द नाही, त्यामुळे साखर कारखान्यांनी कोणतीही भीती न बाळगता इथेनॉल तयार करावे ते सर्व विकत घेण्याची ग्वाही मी देतो असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari)म्हणाले.

हे पण वाचा – ‘भारताला सर्वात पुढे घेऊन जायचं आहे’, पेट्रोल -डिझेल ऐवजी,पर्यायी इंधना

तसेच वसंतदादा साखर इन्स्टिट्यूट(Vasantdada Sugar Institute) उद्धघाटन प्रसंगी अनेक दिग्ग्ज नेते उपस्तिथ होते. त्यात अध्यक्षस्थानी शरद पवार अध्यक्ष – राष्टवादी काँग्रेस / माजी केंद्रीय कृषी मंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, विश्वजित कदम,शंभूराज देसाई, सतेज पाटील, खासदार श्रीनिवास पाटील – हेमंत पाटील, साखर आयुक्त शेखर गायकवाड, राष्ट्रीय सहकारी कारखाना महासंघ अध्यक्ष – विद्याधर अनास्कर तसेच माजी मंत्री विजयसिंह मोहिते पाटील त्याठिकाणी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या –