‘या’ तारखेपासून राज्यात पुन्हा पावसाला सुरूवात होणार

पुणे –  राज्यातील अनेक भागात मागील काही दिवसापासून पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे राज्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस नसल्याने उन्हाचा चटका वाढला आहे. राज्यात पाऊस पडत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तर राज्यात येत्या गुरुवारपासून पुन्हा एकदा पावसाला सुरूवात होणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे. तर राज्यातील कोकण आणि विदर्भात मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस पडणार आहे. तर दि ८जुलै गुरुवारी राज्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पूर्व विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पडणार आहे असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

तर राज्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस नसल्याने उन्हाचा चटका चांगलाच वाढला आहे, तर राज्यातील काही भागांत दुपारनंतर काही अंशी ढगाळ वातावरण तयार होत आहे. वाढत्या उन्हामुळे कमाल तापमानात चांगलीच वाढ झाली आहे, मात्र आता राज्यातील काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल.

तर येत्या २ दिवसात म्हणजेच दि ८ जुलै आणि ९ जुलै या रोजी राज्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

महत्वाच्या बातम्या –