🕒 1 min read
मुंबई – डिसेंबर महिन्याच्या शेवटीपासून नववर्षाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांच्या अडचणीत अजूनच भर पडताना दिसत आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटीपासून अवकाळी पाऊस व त्यानंतर तयार झालेल्या ढगाळ वातावरणामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. मागच्या वर्षी पण शेतकऱ्यांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागले होत. तर राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून आता खतांच्या (fertilizers) दरात मोठी वाढ झाल्याने शेतकरी चिंतेत आहे.
खतांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. रब्बी हंगामात काळ्या बाजारातही शेतकऱ्यांना खते सध्या मिळत नसल्याचं सांगण्यात येत आहे. पोटॅश, १०.२६.२६ सह इतर खतांच्या दरात अधिक वाढ झाली आहे.
तर १०.२६.२६ या खताचे (fertilizer) दर खरिपात ११७५ रुपये प्रति गोणी (एक गोणी ५० किलो) एवढे होते. तर यात वाढ झाली असून सध्या १५०० रुपयात (एक गोणी ५० किलो) मिळत आहेत. पोटॅशचे (एक गोणी ५० किलो) दर खरिपात १०४० एवढे होते. नंतर तर यात वाढ झाली असून पोटॅशचे दर १३५० रुपये प्रति गोणी इतके झाले आणि सध्या, तर १७०० रुपये प्रति गोणी इतके दर आहेत. यातच गेल्या तीन महिन्यांपासून १०.२६.२६, १२.३२.१६, १४.३५.१४, डीएपी या खतांचा पुरवठा विस्कळीत झाला आहे.
आशाच प्रकारे इतर रासायनिक खतांच्या किमती देखील वाढल्या आहेत. रासायनिक खतांच्या किमतीत झालेली ही लक्षणीय वाढ शेतकऱ्यांसाठी एक चिंतेचा विषय बनली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार असल्याचे सांगितले जात आहे.
महत्वाच्या बातम्या –
- हवामान अंदाज : ‘या’ भागांमध्ये येत्या 4 ते 5 दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता
- माहाराष्ट्रात थंडीची लाट; दवाखान्यात वाढली प्रचंड गर्दी!
- लाखात चंदन! रक्तचंदनला एवढी मागणी का?
- ऊसतोड मजुराचा मोठा विक्रम! एकट्या ऊसतोड मजुराने एका दिवसात तोडला 16 टन ऊस
- राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करा – अजित पवार
- अवकाळी पाऊस आणि गारपिटमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; नुकसानीची मंत्र्यांकडून दखल






