टीम महाराष्ट्र देशा- भूसंपादन केलेल्या जमिनीच्या मोबदल्याच्या प्रश्नावरून आठवड्याभरापूर्वी मंत्रालय परिसरात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणारे ८४ वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांचे अखेर रविवारी रात्री निधन झाले.सरकारी प्रकल्पासाठी घेतलेल्या शेतजमिनीला योग्य मोबदला मिळावा यासाठी आत्महत्या करणारे शेतकरी धर्मा पाटील (वय ८४) यांच्या मृत्यूनंतर राज्य सरकारवर विरोधकांनी टीका केली आहे. शेतकरी विरोधी सरकारने एकप्रकारे धर्मा पाटील यांची हत्याच केली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लाज वाटली पाहिजे, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी सत्ताधाऱ्यांवर घणाघाती टीका केली आहे.
जमिनीचा योग्य मोबदला मिळावा म्हणून विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी धर्मा पाटील यांचे निधन. भावपूर्ण श्रद्धांजली !
या शेतकरीविरोधी सरकारने एकप्रकारे त्यांची हत्याच केली आहे. मुख्यमंत्री @dev_fadnavis यांना लाज वाटली पाहिजे.— Supriya Sule (@supriya_sule) January 28, 2018
याशिवाय विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं असून पाटील यांच्या मृत्यूला सरकारच जबाबदार असल्याची टीका केली जात आहे.
सरकारचे सर्वोच्च स्थान असलेल्या मंत्रालयात येऊन तुम्ही जीव दिला तरी हे गेंड्याच्या कातडीचे सरकार @CMOMaharashtra तुम्हाला न्याय देऊ शकत नाही हे धर्मा पाटील यांच्या निधनाने स्पष्ट झाले आहे. या सरकारचा धिक्कार असो.
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) January 28, 2018
दोनच दिवसांपूर्वी धर्मा पाटील यांच्या तब्येतची चौकशी करण्यासाठी गेलो होतो. त्यांचे निधन धक्कादायक आहे. हे सरकार नक्की कुणासाठी काम करतंय? जनतेला न्याय देऊ शकत नसाल तर सत्तेत राहण्याचा काय अधिकार? नरेंद पाटील तुमच्या लढ्यात आम्ही सोबतआहोत. धर्मा पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली pic.twitter.com/ddwTkDqIrc
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) January 29, 2018
धर्मा पाटील यांचा मृत्यू ही सरकारी हत्या आहे. सरकारविरोधात 302 चा गुन्हा दाखल केला पाहिजे.-अशोक चव्हाण
जमिनीचा योग्य मोबदला मिळावा म्हणून मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी धर्मा पाटील यांचे निधन. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ! धर्मा पाटील यांचा मृत्यू ही सरकारी हत्या आहे. सरकारविरोधात 302 चा गुन्हा दाखल केला पाहिजे. pic.twitter.com/vLp1fy539Y
— Ashok Chavan (@AshokChavanINC) January 29, 2018
भावपुर्ण श्रद्धांजली pic.twitter.com/VXBBCkoWDK
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 29, 2018
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या न्यायालयीन चौकशीची मागणी
Deeply pained by the death of 84 year old farmer, Dharma Patil who fought against insensitive & apathetic Govt. Messed up loan waiver, non-remunerative farm prices & cruel land acquisition with unfair compensation has ended another precious life. Order judicial enquiry.
— Prithviraj Chavan (@prithvrj) January 29, 2018