यंदा साखर उत्पादनात महाराष्ट्रच अव्वल ठरणार; आतापर्यंत ६२० लाख टन साखर उत्पादन

साखर उत्पादन

मुंबई –  महाराष्ट्रात (Maharashtra) गळती हंगाम २०२१-२२ मध्ये २३ जानेवारी २०२२  पर्यंत तब्बल १९३ साखर कारखाने (Sugar factory) उसाचे गाळप सुरू. राज्यातील साखर उत्पादनात चांगलीच वाढ झाली आहे. तर ९८ खासगी व ९६ सहकारी तसेच साखर कारखान्यांचा समावेश आहे. आतापर्यंत राज्यात १९३ साखर कारखान्यांकडून ६५९.०६ लाख टन उसाचे गाळप (Sugarcane flour) करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात २३  जानेवारी २०२२  पर्यंत तब्बल ६५७.०९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन (Sugar production) झाले आहे. अशी माहिती आयुक्तालयाकडून मिळाली आहे, तर  यामुळे राज्यातील साखर उताऱ्यात चांगली वाढ झाली असून आता महाराष्ट्राचा सरासरी साखर उतारा ९.९७  टक्के इतका आहे.

तर राज्यातील सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक ४५ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये तब्बल १५६.५९ लाख टन उसाचे गाळप (Sugarcane flour)झाले आहे. तर सोलापूर जिल्ह्यामध्ये १४०.८३  लाख क्विंटल साखरेचे उत्पादन (Sugar production) करण्यात आले आहे.