मुंबई – हवामान Weather विभागाचा अंदाज पुढील २ ते ३ दिवस राज्यात थंडीचा कडाका (Cold snap) वाढणार आहे अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानात मोठी घट झाली आहे. राज्यातील मुंबई भागात आज १४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर राज्यातील नाशिक, पुणे आणि औरंगाबाद जिल्ह्यांमध्ये 25 अंशाखाली कमाल तापमान नोंदवल्या गेलं आहे. तर धुळीच्या वादळाचा परिणाम देखील दिसून आला. मुंबईसोबतच राज्यातील अनेक भागात पश्चिमी चक्रवातामुळे २ तीन ते ३ दिवस तापमानात घट होईल असा अंदाज हवामान विभागाने दिली आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये पारा आणखी खाली घसरणार असून थंडीची लाट येणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भ, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागांमध्ये पुढील काही दिवस थंडीचा कडाका मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. मुंबईत आज अधिक तापमान २९ तर किमान तापमान १४ अंश सेल्सिअस राहील. तर राज्यातील पुणे जिल्ह्यात किमान तापमान २६ तर कमाल तापमान १२ अंश आहे. नागपूरमध्ये किमान तापमान २५ तर कमाल तापमान ९ डिग्री राहील अशी शक्यता आहे. नाशिकमध्ये २४ डिग्री कमाल तर ६ डिग्री किमान तापमान राहील. औरंगाबादमध्येही अशीच स्थिती राहील.
तर आज दिवसभरासाठी नागपूर वेधशाळेनं विदर्भातल्या बुलढाणा, यवतमाळ, नागपूर, आणि गोंदिया जिल्ह्यांसाठी थंडीच्या लाटेचा ‘यलो अलर्ट’ कायम ठेवलाय.
महत्वाच्या बातम्या –
- शेतकर्यांसाठी केंद्र सरकारने सुरु केल्या आहेत ‘ह्या’ ६ महत्वाच्या योजना
- हवामान अंदाज – आजपासून पुढील 2 दिवस ‘या’ भागात थंडीची लाट येणार
- कृषी पंप वीज थकबाकीच्या ५० टक्के रक्कम भरल्यास वीज बील कोरे होणार – दत्तात्रय भरणे
- थंडीची हुडहुडी; राज्यात २ ते ३ दिवस थंडीचा कडाका वाढणार
- पावसाचा नवा विक्रम: १२२ वर्षानंतर पाहिल्यांदाज ‘या’ भागात पडला ८८.२ मिलीमिटर पाऊस
- Budget २०२२: यंदाच्या अर्थसंकल्पात किसान क्रेडिट कार्डची मर्यादा वाढविण्याची शक्यता
- साधारण खोकला म्हणून दुर्लक्ष करत असाल तर ठरू शकते जीवघेणे : वाचा सविस्तर.