चांगली बातमी – उद्यापासून राज्यात थंडीचा कडाका कमी होणार

थंडीचा कडाका

मुंबई – हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला आहे. उत्तर महाराष्ट्रासह पुणे, नाशिक, नागपूर, जालना या ठिकाणी आणखी थंडीची लाट आहे. धुळे जिल्ह्यात तापमानाचा पारा पुन्हा घसरला आहे. धुळ्यात आज तापमानाचा पारा 6.5 अंश सेल्सिअस वर गेला आहे. तर राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये  उन्हाचा चटका वाढू लागला आहे. राज्यात मागील काही दिवसापासून थंडी मोठ्या प्रमाणात वाढत होती.

तर यातच आता एक चांगली बातमी आहे हवामान विभागाने दिलेल्या माहिती माहितीनुसार १४ फेब्रुवारीनंतर थंडीचा कडाका मोठ्या प्रमाणात थंडी  कमी होणार असून उन्हाचा चटका वाढणार आहे .  मुंबईसह राज्यातील मुंबईसह अनेक जिल्ह्यांत  चांगले सुर्यप्रकाशित वातावरण राहील. मोठ्या प्रमाणात उन पडत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उन्हाचा चटका मोठ्या प्रमाणात वाढला आहे त्यामुळे राज्यातील थंडीचा कडाका (Cold snap) कमी होत आहे.  तर राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

महत्वाच्या बातम्या –