राज्यात गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा जादा साखर कारखाने सुरू; ‘या’ जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने सुरू

साखर कारखाने

सोलापूर –राज्यात आतापर्यंत  १९७  साखर कारखान्यांकडून ७८८.५४ लाख टन उसाचे गाळप (Sugarcane flour) करण्यात आले आहे.  राज्यात गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा जादा साखर कारखाने (Sugar factory) सुरू झाले आहे, राज्यात मागच्या वर्षी १९० साखर कारखाने सुरु झाले आहे. तर राज्यात यंदा तब्बल १९७  साखर कारखाने सुरु झाले आहे.  महाराष्ट्रात (Maharashtra) गळती हंगाम २०२१-२२ मध्ये ८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत तब्बल १९७  साखर कारखाने ) सुरू. राज्यातील साखर उत्पादनात चांगलीच वाढ झाली आहे. तर 9९ खासगी व 9८ सहकारी तसेच साखर कारखान्यांचा समावेश आहे.

महाराष्ट्रात ८ फेब्रुवारी २०२२  पर्यंत तब्बल ७९८.७९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन (Sugar production) झाले आहे. तर गेल्या हंगामात महाराष्ट्राने १०१४ लाख टन उसाचे गाळप केले होते अशी माहिती आयुक्तालयाकडून मिळाली आहे, तर  यामुळे राज्यातील साखर उताऱ्यात चांगली वाढ झाली असून आता महाराष्ट्राचा सरासरी साखर उतारा (Sugar extraction) १०.१३ टक्के इतका आहे.

राज्यातील सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक ४६ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये तब्बल १७७.७६ लाख टन उसाचे गाळप (Sugarcane flour)झाले आहे. तर सोलापूर जिल्ह्यामध्ये १६१.५१  लाख क्विंटल साखरेचे उत्पादन (Sugar production) करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या –