औरंगाबाद – कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट झाल्यानंतर नागरिकांनी कोरोना संबंधी नियम पाळण्यात कसूर करण्यास सुरूवात केली होती. मात्र, त्यामुळे रुग्ण संख्येत पुन्हा एकदा झपाट्याने वाढ झालीय. महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार गेल्या २४ तासात राज्यात ३५ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. मात्र, असे असले तरी राज्यातील नागरिक कोरोनाबाबत अद्याप सावध झालेले दिसत नाही.
राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही जनतेशी संवाद साधत कोरोनाचे नियम पाळण्याचे आवाहन केले आहे. इतकेच नाही तर, नियम पाळले नाही तर पुन्हा लॉकडाऊन लावण्याची तयारी असल्याचा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिलाय. मात्र, असे असतानाही राज्यात अनेक राजकीय आणि सांस्कृतीक कार्यक्रम सुरूच असल्याचं दिसून येतय. रस्त्यावरही लोक मास्क न लावताना फिरतांना दिसत आहे.
गेल्या २४ तासात महाराष्ट्रात ६ हजार ९७१ कोरोना रुग्णांची वाढ नोंदवण्यात आली आहे. तर २ हजार ४१७ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. मात्र, या सर्वात २४ तासातील मृत्यूचा आकडा ३५ रुग्णांवर पोहोचला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनामुळे झालेल्या मृतांची संख्या ५१ हजार ७८८ वर पोहोचली आहे. राज्यातील सक्रिय रुग्ण संख्येतही वाढ झाली असून सध्या ५२ हजार ९५६ सक्रिय रुग्ण असल्याचे आरोग्य विभागाने कळवले आहे.
महत्वाच्या बातम्या –
- मोठी बातमी – ‘या’ जिल्ह्यातील २८ तारखेपर्यंत शाळा राहणार बंद तर रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू
- मोठी बातमी – कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ‘या’ जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार १५ मार्चपर्यंत बंद
- ‘या’ जिल्ह्यातील आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा निधी परत करावा लागणार
- मराठवाड्यात कोरोनाचा कहर; ‘या’ जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ
- राज्यातील ‘या’ सात जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा