मुंबई : यंदाच्या अर्थसंकल्पात (Budget) शेतकऱ्यांसाठी कोणत्या घोषणा होणार याकडे आता सगळ्या शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यंदाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे अर्थसंकल्पीय अधिवेशन महत्त्वाचं असल्याचं म्हटलं आहे. हे. यंदाचा अर्थसंकल्प पूर्णपणे डिजिटल असणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात देशातील नागरिकांचे अर्थसंकल्पात (Budget) शेतकऱ्यांसाठी कोणत्या घोषणा होणार याकडे आता सगळ्या नागरिकांचे लक्ष लागले आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे देशातील शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट आले आहे. यामुळे आता यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा आहेत.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यंदाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात (Budget) शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहे, तर या मध्ये शेती क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. केंद्रीय अर्थमंत्रीनिर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी कृषी क्षेत्रासाठीही महत्त्वाच्या घोषणा केल्या.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले आहे कि शेतमालावर प्रकिया क्षेत्राला प्रोस्तासहन देणार. देशांतर्गत तेल बियाणं उत्पादन वाढवणार, नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणार, आधुनिक काळातील शेतीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कृषी विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात सुधारणा करण्यासाठी राज्यांना प्रोत्साहन दिले जाईल. रासायनिक मुक्त नैसर्गिक शेतीला देशभर चालना दिली जाईल, अश्या महत्त्वाच्या घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात केल्या आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शेतीसाठी काही घोषणा केल्या आहे यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की 9 लाख हेक्टर जमीन पाण्याखाली येणार आहे. तसेच 5 नदीजोड प्रकल्पाची ब्लू प्रिंट तयार करणार आहे. तर त्यांनी सांगितलं आहे की यामध्ये तापी नर्मदा, कृष्ण पेन्नार, गोदावरी कृष्णा, दमनगंगा नदी जोड प्रकल्प केला जाणार आहे. कृषी क्षेत्रातील स्टार्ट अप प्रकल्पासाठी मोठी मदत केली जाणार आहे. तसेच पिकांवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर वाढवणार असल्याचे देखील अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले आहे कि शासनाकडून शेतकऱ्यांना डिजिटल सेवा देण्यात येणार आहे. सेंद्रिय शेतीवर शासनाचा भर असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. त्याचबरोबर तेलबियांच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या –
- सतर्क राहा! राज्यातील ‘या’ ९ जिल्ह्यांमध्ये दोन दिवस जोरदार पावसासह गारपीट होण्याची शक्यता
- चांगली बातमी – राज्यातील कोरोना निर्बंध शिथील, जाणून घ्या नियमावली
- थंडीचा कडाका वाढणार : पुढील 24 तासात राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट येणार
- हवामान अंदाज – राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसासह गारपीट होण्याची शक्यता
- त्वचेवर खाज येते असेल तर मग करा ‘हे’ घरगुती उपाय!
- आज संसदेत अर्थसंकल्प सादर होणार; यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना काय मिळणार?
- PM गतीशक्ती योजनेतून पायाभूत सुविधेवर भर – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांची माहिती