मुंबई : ‘नवीन कृषीपंप वीज जोडणी धोरणांतर्गत 19 फेब्रुवारीपर्यंत 10 हजार शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्याचे उद्दिष्टापेक्षा अधिक काम करत सुमारे 18 हजार शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्यात आली आहे. तसेच 10 हजाराहून अधिक सौर कृषीपंप देण्यात आले आहेत. कृषी वाहिन्यांचे सौर ऊर्जीकरण अंतर्गत 84 वाहिन्यांना लघु सौर ऊर्जा प्रकल्पातून वीज पुरवली जात असून त्याद्वारे 30 हजाराहून अधिक शेतीपंपांना दिवसा वीज पुरवठा केला जात आहे.’ अशी माहिती राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे.
तर, आतापर्यंत सुमारे 4 लाख शेतकऱ्यांनी कृषी वीज बिलांची एकूण 364 कोटी रुपयांची थकबाकी भरली आहे. या थकबाकीच्या अनुषंगाने 668 कोटी रुपयांची थकबाकी माफ झाली आहे, असं महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सांगितलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, ‘आम्ही शेतकऱ्यांचे प्रतिनिधी असून शेतकऱ्यांचे प्रश्न, कृषीपंपांचे महत्त्व आम्हाला माहीत आहे. सर्वांना व्यवस्थित वीज मिळेल. वेळेत वीजेची जोडणी मिळेल हे आमचे उद्दिष्ट आहे. 5 वर्षात 5 लाख सौर कृषी पंप देण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याच्या अनुषंगाने सौर कृषी पंप योजनेला प्रोत्साहन देण्याचे शासनाचे धोरण आहे.’
महत्वाच्या बातम्या –
- महत्त्वाची बातमी – राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी ‘ही’ आहे अट
- मोठी बातमी – राज्यातील ‘या’ जिल्ह्यात कोरोना सातत्याने वाढत असल्यामुळे ७ मार्चपर्यंत लॉकडाऊन जाहीर
- राज्यात लॉकडाऊन होणार नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करण्याचे कारण नाही – दत्तात्रय भरणे
- राज्यातील ‘या’ पाच जिल्ह्यात अवकाळीमुळे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त पिकांचे नुकसान
- पोटातील गॅसचा त्रास दूर करण्यासाठी करा हे ‘5’ घरगुती उपाय