दिल्ली – मागील काही दिवसांपासून उत्तर भारतात होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे थंडीचा कडाका वाढला आहे. यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे. देशाची राजधानी दिल्लीत दाट धुके पडले आहे. पुढील दोन ते तीन दिवस दिल्लीत दाट धुके राहण्याची शक्यता हवामान (Weather) विभागाने वर्तवली आहे.
तर भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार वायव्य भारतातील पश्चिमी चक्रावाताच्या प्रभावामुळे राजस्थान आणि परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. आज आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेशासह पूर्वोत्तर राज्यामध्ये गारपिटीसह, जोरदार (Heavy) पावसाची शक्यता आहे.
तर देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे अशी माहिती हवामान विभागानेदिलेली आहे. तर देशातील दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार आणि पंजाबच्या राज्यांमध्ये मैदानी भागात जोरदार वारे वाहत आहेत. त्यामुळे या राज्यांमध्ये सर्व राज्यामध्ये थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार आजही दिल्लीत ढगाळ वातावरण राहणार आहे. तसेच अनेक भागात पाऊस पडण्याची शक्यता सांगण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या –
- सतर्क राहा! ‘या’ भागांमध्ये जोरदार पावसासह गारपीट होण्याची शक्यता; भारतीय हवामान विभागाचा अंदाज
- ९० टक्के सबसिडीवर मागास वर्गीय व सर्वसामान्य गटातील शेतकऱ्यांना पशुधन वाटपाचा पथदर्शी प्रकल्प सुरू
- दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या सरावासाठी प्रश्नपेढी – विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे वर्षा गायकवाड यांचे आवाहन
- राज्यातील ‘या’ लहानशा गावातील शेतकऱ्यांनी शेतात पिकवला विदेशी काळा ऊस
- शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसान योजनेचा ११ वा हप्ता या महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार
- ग्रामीण भागाच्या विकासाला पक्क्या रस्त्यांमुळे येणार गती – बच्चू कडू