सोलापूर – राज्यातील सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक ४६ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये तब्बल १७४.०७ लाख टन उसाचे गाळप (Sugarcane flour)झाले आहे. तर सोलापूर जिल्ह्यामध्ये १५७.८६ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन (Sugar production) करण्यात आले आहे.
राज्यात गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा जादा साखर कारखाने (Sugar factory सुरू झाले आहे, राज्यात मागच्या वर्षी १९० साखर कारखाने सुरु झाले आहे. तर राज्यात यंदा तब्बल १९७ साखर कारखाने सुरु झाले आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) गळती हंगाम २०२१-२२ मध्ये १ फेब्रुवारी २०२२ पर्यंत तब्बल १९७ साखर कारखाने ) सुरू. राज्यातील साखर उत्पादनात चांगलीच वाढ झाली आहे. तर 9९ खासगी व 9८ सहकारी तसेच साखर कारखान्यांचा समावेश आहे. आतापर्यंत राज्यात १९७ साखर कारखान्यांकडून ७३३.१६ लाख टन उसाचे गाळप (Sugarcane flour) करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात १ फेब्रुवारी २०२२ पर्यंत तब्बल ७३३.९७ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन (Sugar production) झाले आहे. अशी माहिती आयुक्तालयाकडून मिळाली आहे, तर यामुळे राज्यातील साखर उताऱ्यात चांगली वाढ झाली असून आता महाराष्ट्राचा सरासरी साखर उतारा (Sugar extraction) १०.०७ टक्के इतका आहे.
महत्वाच्या बातम्या –
- ई-केवायसी पूर्ण कराल तरच मिळेल पीएम किसान योजनेचा 11वा हफ्ता; माहित करून घ्या कशी करावी
- हवामान अंदाज – राज्यातील ‘या’ भागात विजांच्या कडकडाटासह गारपीटचा पाऊस पडण्याची शक्यता
- ‘पोकरा’ अंतर्गत ६५ हजार शेतकऱ्यांना लाभ; डीबीटीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात ३२१ कोटींचे अनुदान जमा
- ऊस गाळपासह साखर उत्पादनात ‘हा’ जिल्हा राज्यात आघाडीवर
- वाईनवरून शेतकऱ्यांची बदनामी थांबवा – राजू शेट्टी
- मंत्रिमंडळ मोठे निर्णय : दि. 2 फेब्रुवारी २०२२
- राज्यातील साखर उत्पादनात वाढ; आतापर्यंत ७२९.०२ लाख टन साखर उत्पादन