मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशासह राज्यात अक्षरशः थैमान घातले आहे. शहरी भागासह ग्रामीण भागात कोरोनाचा कहर सुरूच आहे. अनेक रुगांना आपला जीव गमवावा लागला आहे. हा प्रभाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत राज्यात ३१ मे पर्यंत कडक निर्बंध लावले आहेत. मात्र अजूनही कोरोनाचा धोका काही कमी झाला नाही, त्यामुळे हे निर्बंध अजून वाढवण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
१ जून नंतर राज्यात लॉकडाऊन वाढणार का यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वाची माहिती दिली आहे. ‘१ जूनपासून निर्बंध टप्प्याटप्प्यानं शिथिल केले जातील. कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात असलेल्या जिल्ह्यांमधील निर्बंध हळूहळू मागे घेतले जातील,’ अशी माहिती राजेश टोपेंनी दिली आहे.
‘सध्या राज्यात कठोर निर्बंध लागू आहेत. दुकानं केवळ सकाळी ७ ते ११ या वेळेतच सुरू ठेवण्याची मुभा आहे. याचा परिणाम अनेक ठिकाणी दिसून आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला आहे. मुंबईसह एमएमआर रिजनमधील स्थिती नियंत्रणात आहे. नाशिक, नागपूरमधील परिस्थितीदेखील चिंताजनक नाही. त्यामुळे या भागातील निर्बंध १ जूनपासून हळूहळू शिथिल केले जातील. निर्बंध एकदम मागे घेण्याऐवजी टप्प्याटप्यानं मागे घेतले जातील. कोरोना रुग्णसंख्या कमी झालेल्या जिल्ह्यांसाठी या प्रकारचे निर्णय घेतले जातील,’ अशी माहिती राजेश टोपेंनी दिली.
महत्वाच्या बातम्या –
- जिल्ह्यासाठी चांगली बातमी – सलग तिसऱ्या दिवशी नव्या कोरोना बाधितांची संख्या एक हजाराच्या आत
- केस पांढरे होण्यापासून रोखण्यासाठी घरगुती उपाय, जाणून घ्या
- मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय: दि. १९ मे २०२०
- ‘हा’ उपाय करून एका मिनिटात घालवा दातांचा पिवळेपणा!
- ग्राम रक्षक दल अधिक कार्यक्षम बनवून कोरोनामुक्त गाव अभियान राबवा – बाळासाहेब थोरात