मुंबई – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्प (Budget 2022) सादर केला. यात त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. त्याच सोबत शेतकऱ्यांसाठी देखील अनेक महत्वपूर्ण योजनांची घोषणा केली आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यंदाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात (Budget) शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहे, तर या मध्ये शेती क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.
शेतकऱ्यांसाठी केलेल्या घोषणा खालील प्रमाणे…
- शेतकऱ्यांना मशीन भाड्याने देण्यासाठी आणि नव-नवीन माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा उपयोग जाईल
- शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेती करावी यासाठी राज्य सरकारे आणि एमएसएम म्हणजे लघु उद्योगांच्या भागीदारीसाठी व्यापक पॅकेज देण्यात येईल.
- छोट्या शेतकऱ्यांसाठी रेल्वे सेवा आणणार
- ६८ लाख लोकांसाठी पेयजल योजनाचा लाभ दिले जाणार
- शेतकऱ्यांच्या शेतीच्या असेसमेंटसाठी ड्रोन टेक्नॉलॉजीची मदत घेतली जाणार. सोबतच ड्रोनच्या माध्यमातून ६ न्यूट्रिएंट आणि कीटकनाशकांच्या फवारणीलाही प्रोत्साहन दिले.
- शेतकऱ्यांना डिजिटल सुविधांसाठी डीपीपी योजना
- तेलबियांची आयात घटवण्याच्या दृष्टिकोनातून घरगुती उत्पादनवाढीसाठी प्रोत्साहन दिले जाईल.
- राज्यांच्या शेती विद्यापीठाला रिव्हाईव्ह करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल.
- शेतकऱ्यांच्या खात्यात २.३७ लाख कोटी रूपयांची एमएसपी सरळ ट्रान्सफर केली जाणार.
- येणाऱ्या दिवसांमध्ये केमिकल फ्री नॅचरल फार्मिंगला प्रोत्साहन दिले जाईल. पहिल्या टप्प्यात गंगा किनाऱ्याच्या जवळ असलेल्या शेतकऱ्यांची जमीन ५ किमीच्या कोरिडओरसाठी पहिल्या टप्प्यात निवडली जाईल.
- एमएसपीसाठी शेतकऱ्यांना २.७ लाख कोटी रुपये देणार
महत्वाच्या बातम्या –
- Budget 2022 : शेतकऱ्यांसाठी सर्वात चांगलं बजेट, घरं, रेल्वे, १ लाख कोटी महाराष्ट्राला – खासदार नवनीत राणा
- राज्यात आजपासून कोविड संसर्ग रोखण्यासंदर्भातील नवीन नियमावली लागू, जाणून घ्या
- शेतकऱ्यांना चालू व खरीप हंगामात अडचण येणार नाही यासाठी शेतकऱ्यांना खतांचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी नियोजन करावे – कृषीमंत्री
- चांगली बातमी – राज्यातील कोरोना निर्बंध शिथील, जाणून घ्या नियमावली
- Budget 2022: या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना काय मिळाले?
- ‘कापूस’ पीक घेतंय गगनभरारी !
- भारताचा पहिला अर्थसंकल्प केव्हा आणि कोणी सादर केला?