Share

राज्यातील ‘या’ जिल्ह्यात ४४ साखर कारखान्यांकडून तब्बल १११.२१ लाख टन उसाचे गाळप

Published On: 

🕒 1 min read

मुंबई – राज्यात गळती हंगाम २०२१-२२ मध्ये  ३० डिसेंबर २०२१  पर्यंत तब्बल १८९ साखर कारखाने (Sugar factory) ऊस गाळप सुरू. राज्यातील साखर उत्पादनात चांगलीच वाढ झाली आहे. तर ९४ खासगी व ९५ सहकारी तसेच साखर कारखान्यांचा (Sugar factory) समावेश आहे. राज्यातील सोलापूर जिल्ह्यात  सर्वाधिक साखर कारखाने सुरु झाले आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये ४४ साखर कारखाने सुरु झाले आहे. तर राज्यातील सोलापूर जिल्ह्यामध्ये तब्बल १११ लाख २१ हजार लाख टन उसाचे गाळप (Sugarcane flour)झाले आहे. तर सोलापूर जिल्ह्यामध्ये ९७ लाख २८  हजार लाख क्विंटल साखरेचे उत्पादन (Sugar production) करण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील  साखर उतारा ८.७५ टक्के आहे.

आतापर्यंत राज्यात १८८ साखर कारखान्यांकडून ४६४.५० लाख टन उसाचे गाळप (Sugarcane flour) करण्यात आले आहे. राज्यात  ३० डिसेंबर २०२१  पर्यंत तब्बल ४४९.०६ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन (Sugar production) झाले आहे. अशी माहिती आयुक्तालयाकडून मिळाली आहे,  तर  यामुळे राज्यातील साखर उताऱ्यात चांगली वाढ झाली असून आता राज्याचा सरासरी साखर उतारा ९.६७ टक्के इतका आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
बातम्या (Main News)साखर (Sugar)

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon

🕘 संबंधित बातम्या