Share

राज्यात १३ डिसेंबर २०२१ पर्यंत ३०२.०८ लाख क्विंटल साखर उत्पादन

Published On: 

🕒 1 min read

मुंबई –  राज्यात २०२१-२२ मध्ये १३ डिसेंबर २०२१  पर्यंत तब्बल १८५ साखर कारखाने (Sugar factory) सुरु झाले आहे. राज्यातील साखर उत्पादनात चांगलीच वाढ झाली आहे. तर ९२ खासगी व ९३ सहकारी तसेच साखर कारखान्यांचा (Sugar factory) समावेश आहे. तर राज्यातील सोलापूर जिल्ह्यात  सर्वाधिक साखर कारखाने सुरु झाले आहे. तर राज्यातील सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत ४३ साखर कारखाने सुरु झाले आहे. आतापर्यंत राज्यात  जवळपास ३२२.८१ लाख टन उसाचे गाळप करण्यात आले आहे.

राज्यात १३ डिसेंबर २०२१  पर्यंत तब्बल ३०२.०८ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन (Sugar production) झाले आहे. अशी माहिती आयुक्तालयाकडून मिळाली आहे,  तर  यामुळे राज्यातील साखर उताऱ्यात चांगली वाढ झाली असून आता राज्याचा सरासरी साखर उतारा ९.३६ टक्के इतका आहे.

राज्यातील सोलापूर जिल्ह्यात  सर्वाधिक साखर कारखाने सुरु झाले आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये ४३ साखर कारखाने सुरु झाले आहे. तर राज्यातील सोलापूर जिल्ह्यामध्ये तब्बल ७८.३५ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. तर सोलापूर जिल्ह्यामध्ये ६६.२३ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन (Sugar production) करण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील  साखर उतारा १०.६७ टक्के आहे.

तर राज्यातील औरंगाबाद जिल्ह्यामध्ये ७ साखर कारखाने सुरु झाले आहे. ४ खासगी व ३ सहकारी साखर कारखान्यांचा (Sugar factory) समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये तब्बल ५ लाख १७ हजार ४४५ टन उसाचे गाळप झाले आहे. तर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये ४ लाख ६४ हजार ४९५ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन (Sugar production) करण्यात आले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील  साखर उतारा ८.७८ टक्के आहे.४

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
बातम्या (Main News)साखर (Sugar)

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon

🕘 संबंधित बातम्या