हिवाळ्यात गरमऐवजी कोमट पाण्याने अंघोळ करा

हिवाळ्यामध्ये बहुतांश लोक गरम पाण्याने अंघोळ करतात. मात्र, यामुळे नुकसान होऊ शकते. यासाठी नेहमी कोमट पाण्याचा वापर करावा. जाणून घेऊया गरम पाणी आणि इतर सवयींमुळे होणारे नुकसान आणि त्यावरील उपायांविषयी…

– अनेकजण अंघोळ करताना फक्त हातांना, बगलेत आणि चेहऱ्याला साबण लावतात, परंतु संपूर्ण शरीरावर चांगल्या प्रकारे साबण लावला पाहिजे.

– गरम पाण्याने दहा मिनिटांपेक्षा जास्त अंघोळ करू नये.

– गरम पाण्याने स्नायू सैल होतात, असे वाटत असेल तर ते चुकीचे आहे. कारण यामुळे त्वचा रुक्ष होते.

– सतत गरम पाण्याने अंघोळ करण्याऐवजी कधी-कधी कोमट पाण्याने अंघोळ करा. यामुळे त्वचेमध्ये मॉइश्चर टिकून राहील.

– गरम पाण्याने अंघोळ केल्याने इंटर्नल हीट लॉस होते. यासोबतच थंड वातावरणात शरीर सहन करत नाही.

– सुगंधित साबणाने अंघोळ केल्याने त्वचा रुक्ष होऊ शकते.

महत्वाच्या बातम्या –