Share

महाविकास आघाडी सरकार सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे आहे – आदित्य ठाकरे

Published On: 

महाविकास आघाडी सरकार सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे आहे – आदित्य ठाकरे

मुंबई – राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी १० हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण  यांनी चर्चा करून मंत्रिमंडळ बैठकीत यासंदर्भात घोषणा केली. राज्यात जून ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत अतिवृष्टी त्याचप्रमाणे पुरामुळे ५५ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकाचं नुकसान झाले.  या नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषांची वाट न पाहता १० हजार कोटींचे अर्थसहाय्य (पॅकेज) जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या मदतीवरून पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत. ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी १० हजार कोटींचे अर्थसहाय्य जाहीर केल्याबद्दल आभार मानतो. मविआ सरकार सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे आहे असे ट्विट आदित्य यांनी केले आहे.

जून ते ऑक्टोबर २०२१ या काळात राज्यात पुरांमुळे तसेच अतिवृष्टीमुळे ५५ लाख हेक्टरहून अधिक शेतीपिकांचे नुकसान झाले. त्यामुळे ही मदत जाहीर करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये जिरायतीसाठी १० हजार रुपये प्रति हेक्टर, बागायतीसाठी १५ हजार रुपये प्रति हेक्टर, बहुवार्षिक पिकांसाठी २५ हजार रुपये प्रति हेक्टर, तसेच ही मदत २ हेक्टर मर्यादेत करण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या – 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
बातम्याराजकारण (Politics)

Join WhatsApp

Join Now
महाविकास आघाडी सरकार सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे आहे – आदित्य ठाकरे

🕘 संबंधित बातम्या