राज्यात कोरोनाचा उद्रेक; गेल्या २४ तासात ४०,९२५ कोरोनाबाधितांची नोंद

मुंबई –  राज्यात कोरोनारुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. कोरोना (corona)  विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमायक्रॉनची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. भारतातही या व्हेरिएंटने शिरकाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. राज्यातही ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. देशात कोरोनाचे (corona)  रुग्णही हळूहळू वाढू लागले आहे. मागील १५ दिवसापासून राज्यात कोरोना मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडले आहेत.

राज्यातील कोरोना रुग्ण संख्येत गेल्या २४ तासात मोठी वाढ झाली आहे. राज्यात गेल्या 24 तासांत ४०,९२५ नवे कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर राज्यात गेल्या २४ तासात २० रुग्णांनी कोरोनामुळे  जीव गमावला आहे.  तर मुंबईत गेल्या २४ तासात २०, ९७१ रुग्ण कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे.  मुबंईत गेल्या २४ तासात ६ रुग्णांनी कोरोनामुळे  जीव गमावला आहे.

महत्वाच्या बातम्या –