मंत्रिमंडळ निर्णय: बाजार समित्यांना बळकट करण्यासाठी पणन अधिनियमात सुधारणा करणार

मुंबई – राज्यातील बाजार समित्यांना अधिक बळकट करण्यासाठी महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय  झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. यानुसार बाजार समितीवर संचालक निवडून देण्यासाठी ज्या बहुउद्देशिय  सहकारी संस्था त्यांच्या सदस्यांना पीक कर्ज वितरीत करतात त्यांनाच मतदानाचा अधिकार देण्याचे प्रस्तावित करण्यात आले … Read more

बी-बियाणे आणि कीटकनाशके यांच्या ट्रॅकिंगसाठी लवकरच ई-मॉनिटरिंग प्रणाली – कृषीमंत्री

पोकरा

मुंबई – शेतकऱ्यांना वेळेत आणि वाजवी किमतीत बियाणे आणि किटकनाशके मिळावीत. उत्पादक कंपन्यानी तयार केलेली उत्पादने उत्तम दर्जाची असावीत. बी-बियाणे आणि किटकनाशकांची विक्री होताना त्यात कोणत्याही प्रकारची भेसळ होऊ नये, यासाठी उत्पादक कंपन्या आणि त्यांच्यामार्फत तयार होणारी उत्पादने यांचे ट्रॅकिंग होणारी यंत्रणा लवकरच कार्यांवित करण्यात येत असून यासाठी ई-मॉनिटरिंग प्रणाली विकसित करण्यात येत असल्याची माहिती … Read more

‘या’ घरगुती उपायाने तोंडाची दुर्गंधी दूर होईल

तोंडाची दुर्गंधी

तोंडाला वास येणे म्हणजे श्वासाला वास येणे. हा दुर्गंध दोन  कारणांनी येतो. एक म्हणजे पोटात अपचनासारखे आजार असणे. याशिवाय आहारात कांदा, मासे, लसूण असल्यास यामुळेही वास येतो. दुसरे कारण म्हणजे तोंडातल्या  अस्वच्छतेमुळे  जंतूंची वाढ होऊन कुजण्याची प्रक्रिया होणे. घाण वास येण्यामागे बहुतेक वेळा हे दुसरे कारण आढळते. म्हातारपणात लाळेचे प्रमाण कमी पडते. त्यामुळे  तोंडाची स्वच्छता कमी राहते. म्हातारपणात दुर्गंध … Read more

राज्यात ओमिक्रॉनचा शिरकाव; गेल्या २४ तासात ‘इतके’ रुग्ण आढळले

नवी दिल्ली: जगभरात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं कहर सुरु आहे. कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन (Omicron)चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमिक्रॉनची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्रातही या विषाणूने शिरकाव केला आहे. राज्यात सुरुवातीला या नव्या व्हेरिएंटचे २ रुग्ण आढळले. त्यानंतर सोमवारी(६ डिसें.)ओमायक्रॉनचा(Omicron) दहावा रुग्ण सापडला आहे. त्यामुळे भारताची चिंता वाढली आहे. सोमवारी मुंबईत … Read more

‘या’ तारखेपासून मुंबई आणि पुण्यातील शाळा सुरू होणार

मुंबई: मुंबई आणि पुणे पालिकेने (Municipal Corporation) शाळा सुरु करण्याविषयी मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई महानगरपालिकेकडून १ डिसेंबरपासून शाळा सुरू होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. सुरुवातीला १ डिसेंबर पासून शाळा सुरू करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला होता मात्र आता ओमायक्रॉनच्या (omicron) संसर्गामुळे ही तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. ओमिक्रोनच्या पार्श्वभूमीवर याठिकाणच्या प्रशासनाकडून परिस्थितीचे निरीक्षण करत … Read more

कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी आता साडेतीनशे रुपयांत; खासगी प्रयोगशाळांमधील कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा एकदा कमी – राजेश टोपे यांची माहिती

मुंबई – राज्यात खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा एकदा सुधारित करण्यात आले आहेत. कोरोना निदानासाठी करण्यात येणाऱ्या आरटीपीसीआर चाचणीसाठी ३५० रुपये आकारण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. यासंदर्भात आरोग्य विभागाने शासन निर्णय देखील जाहीर केला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या वर्षापासून जाणवत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून खासगी प्रयोगशाळांमध्ये … Read more

अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाची मदतीची भूमिका – जयंत पाटील

जयंत पाटील

सांगली – सांगली जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे वाळवा, तासगाव, पलूस, खानापूर, आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, तासगावचा पूर्व भाग या सर्व ठिकाणी शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. विशेषत: द्राक्षबागेचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातात आलेल्या द्राक्षबागा गेलेल्या आहेत. यांचा पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत. पंचनामे सुरू आहेत. शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. … Read more

परराज्यातून व जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांचे ट्रॅकिंग व टेस्टिंग करा व लसीकरणाचा वेग वाढवा – विजय वडेट्टीवार

चंद्रपूर – कोरोना विषाणूचा नवा व्हेरीएंट ओमिक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेता प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. यामध्ये परराज्यातून व जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांचे ट्रॅकिंग व टेस्टिंग करा व लसीकरणाचा वेग वाढवा.असे निर्देश आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील वीज कलमी सभागृहात ओमिक्रॉन संदर्भाने करावयाच्या नियोजनाबाबत संबंधित अधिकाऱ्यांसोबत … Read more

अवकाळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे राहील – विश्वजीत कदम

कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम

सांगली – डिसेंबर महिन्याच्या सुरूवातीला सांगली जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे आणि विशेषत: द्राक्ष बागायतदारांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. हवामानाची अनियमितता, अचानकपणे पडणारा पाऊस यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे. डिसेंबर महिन्यामध्ये अचानकपणे मोठा पाऊस झाल्यामुळे सरकारला नविन अडचणीला सामोरे जावे लागत आहे.  या अडचणीवरही मात करण्यासाठी शासन सक्षम आहे. या संकटाच्या प्रसंगी शेतकऱ्यांना राज्य … Read more

ग्रामीण आरोग्य व्यवस्थेची गुणवत्ता वाढण्यास प्रशिक्षण कार्यक्रम उपयुक्त – राजेश टोपे

मुंबई – टेमासेक फाऊंडेशन, सिंग हेल्थ आणि महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने राबवला जाणारा प्रशिक्षण कार्यक्रम ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेची गुणवत्ता वाढवण्यास उपयुक्त ठरेल, असा विश्वास सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे. टेमासेक फाऊंडेशन, सिंग हेल्थ आणि महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या हॉस्पिटल इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅनिंग, डिझाईन अँड फ्लो कार्यक्रमाचे उद्घाटन … Read more