रोज एक ग्लास कारल्याचा रस प्यायल्याने शरीरातील पचनक्रिया सुरळित होते, खाल्लेलं पचायला मदत होते. कारल्याने आपल्याला भूकही लागते आणि त्याचबरोबर आपलं वजन कमी होण्यास मदत होते.
कारल्याने रोगप्रतिकारक क्षमता वाढते, एक ग्लास कारल्याचा रस आणि त्यात अर्ध लिंबू टाकून प्यायल्याने आजारावर मात करण्याची ताकद आपल्या शरीराला मिळते. कारल्याच्या रसाने त्वचारोगावर नियंत्रण राहते.
कारल्यानं हृदय मजबूत होते, आणि कोणतेही हृदयरोग होत नाहीत. कारलं हे कावीळ आणि हेपिटायटीस यांसारख्या गंभीर आजांरापासून आपल्याला लांब ठेवते.
कारल्याचा रस प्यायल्याने डोळे निरोगी राहतात. कारल्याने डोळ्यांचे आजार होत नाही. कारलं शरीरातील साखरेवर नियंत्रण ठेवतं. सकाळी उपाशी पोटी कारल्याचा रस प्यायल्याने मधुमेहासारखे आजार टाळता येतात
महत्वाच्या बातम्या –
- मोठी बातमी – पंकजा मुंडे यांच्या साखर कारख्यान्यात चोरी
- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘या’ महत्वाच्या सूचना
- मंत्रिमंडळाने घेतले ‘हे’ महत्वाचे निर्णय, माहित करून घ्या
- दूधासोबत ‘हे’ पदार्थ चुकनूही खाऊ नका