Share

महात्मा जोतिराव फुले योजनेंतर्गत ‘या’ जिल्ह्यातील ५६ हजार २५६ शेतकऱ्यांच्या खात्यावर ३५३ कोटी ६३ लाख इतकी रक्कम जमा

Published On: 

महात्मा जोतिराव फुले योजनेंतर्गत ‘या’ जिल्ह्यातील ५६ हजार २५६ शेतकऱ्यांच्या खात्यावर ३५३ कोटी ६३ लाख इतकी रक्कम जमा

🕒 1 min read

राज्याचा सहकार मंत्री म्हणून काम करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०१९ ही योजना २७ डिसेंबर २०१९ रोजी जाहीर करण्यात आली. या योजनेंतर्गत १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ रोजी पर्यंत ज्या शेतकऱ्यांचे २ लाखापर्यंत कर्ज थकीत आहे अशा शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. ही योजना पूर्णत: संगणकीय प्रणालीद्वारे राबविण्यात येत आहेत. या योजनेत ३१.६९ लाख पात्र खातेदार शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली असून ३१ जुलै २०२० अखेर २८.८४ लाख खातेदारांना १८,५४२ कोटी एवढ्या रक्कमेचा लाभ देण्यात आलेला आहे. तसेच उर्वरित शेतकऱ्यांना लाभ देण्याचीही कार्यवाही सुरु आहे. पात्र लाभार्थींना या योजनेचा लाभ अद्याप झालेला नाही अशा खातेदारांच्या कर्जखात्यावर रक्कम शासनाकडून येणे दर्शवून पात्र लाभार्थ्यांना खरीप २०२० साठी कर्ज वितरणास पात्र समजण्यात यावे, असाही निर्णय घेण्यात आलेला आहे.

भाजलेले चणे खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे, जाणून घ्या

राज्यातील २ लाख सहकारी संस्थांपैकी प्रत्येक वर्षी सुमारे ४० हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यात येत असतात. कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका ६ महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत.

शेतीमध्ये घ्या ‘हे’ पिक आणि कमवा लाखो रुपये

महात्मा जोतिराव फुले योजनेंतर्गत सातारा जिल्ह्यातील ५६ हजार २५६ शेतकऱ्यांच्या खात्यावर ३५३ कोटी ६३ लाख इतकी रक्कम खात्यावर जमा करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या –

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये येत्या ३ दिवसात जोरदार पावसाची शक्यता

महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी येत्या २४ तासात मुसळधार पाऊस होणार

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
बातम्याराजकारण (Politics)

Join WhatsApp

Join Now
महात्मा जोतिराव फुले योजनेंतर्गत ‘या’ जिल्ह्यातील ५६ हजार २५६ शेतकऱ्यांच्या खात्यावर ३५३ कोटी ६३ लाख इतकी रक्कम जमा

🕘 संबंधित बातम्या