निरोगी आरोग्यासाठी झोप ही अत्यावश्यक आहे. दुपारी जेवण झाल्यावर झोप येतेच. मात्र, ही सवय आरोग्यासाठी अत्यंत अपायकारक आहे. यामुळे शरीराला अनेक व्याधी जडतात. त्यामुळे या व्याधींपासून दूर राहायचे असेल तर दुपारची झोप टाळावी.
- मधुमेह वाढतो -पचनाची क्रिया असंतुलित होते. यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं.
- त्वचेचे विकार – कफ आणि पित्तदोष निर्माण होऊन अंगाला खाज येऊ शकते. याचसोबत रक्त दूषित होण्याचीही शक्यता असते. यामुळे एक्जिमा, सोरायसिस, शीतपित्त, तीळ आणि वांग यांसारखे त्वचेचे विकार बळावू शकतात. केसात कोंडाही होऊ शकतो.
- अतिप्रमाणात वजन वाढणे – दुपारच्या झोपेमुळे शरीरात फॅट म्हणजेच मेदाचा संचय होतो. यामुळे अतिप्रमाणात वजन वाढण्याची समस्या निर्माण होते.
- जखम न भरणे – कफदोष वाढतो. यामुळे पस निर्माण होऊन जखम चिघळू शकते.
महत्वाच्या बातम्या –
- मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय : दि. ८ सप्टेंबर २०२१
- सार्वजनिक गणेशोत्सव २०२१ निमित्त राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी
- राज्यात एकाच दिवसात तब्बल ‘इतक्या’ नागरिकांचे झाले लसीकरण
- मंत्रिमंडळ मोठा निर्णय: महानिर्मिती राज्यात विविध ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार
- राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची जोरदार पाऊस सुरुच; तर ‘या’ भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा