जाणून घ्या : ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांचे शेतीविषयक धोरण !

पुणे – छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या राज्यकारभाराचे मुख्य प्रधान सूत्र होते कि ‘शेतकरी सुखी, रयत सुखी तर राजा सुखी'(Farmers are happy, Rayat is happy but Raja is happy ‘) छत्रपती शिवाजी महाराज हे लोकांचे कल्याण करत त्यामुळे त्यांना लोककल्याणकारी राजे म्हणत. छत्रपती शिवाजी महाराज यांची जंयती लवकरच येत आहे तर आपण जाणून घेऊयात छत्रपती शिवाजी महाराज यांचे शेतीविषयक धोरण(Agricultural policy).

छत्रपती शिवाजी महाराज यांना शेतकऱ्यांच्या रयतेच्या समस्यांची जाण होती(Was aware of the problems). त्यांची भूमिका होती कि शेतीबद्दल चे जे चित्र आहे ते बदलले पाहिजे त्यासाठी ती नेहमी आग्रही होते. आपल्याला माहीतच आहे कि छत्रपती शिवाजी महाराज हे ५० वर्ष जगले आणि त्यांनी स्वतःचे एक विश्व् निर्माण केले(Created a world) त्यासोबत भविष्यातील पिढ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला.

सरकारने(The government)हि काही योजना राबवल्या आहेत ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना’ महाराष्ट्रातील गरीब शेतकऱ्यांना मदत करते. आपल्या देशातील अनेक शेतकरी कर्जाखाली आहेत. काही शेतकरी हे कर्ज भरू शकत नाही . अश्या शेतकऱ्यांच्या खांद्यावर प्रचंड दबाव येतो. ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी अर्ज कसा करावा हे बरेच जणांना माहित नसून दोन पद्धत असून ऑनलाईन किंवा ऑफलाईन मदतीने तुम्ही ह्या योजनेसाठी अर्ज करू शकता त्यासाठी योजनेंतर्गत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी,
महाराष्ट्र राज्य सरकारच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या – https://csmssy.mahaonline.gov.in/

आपला देश हा शेतीप्रधान देश आहे(Our country is an agricultural country). सध्या शेतकऱ्यांचे प्रश्न मोठ्या स्वरूपाचे बनले आहे, काही प्रश्नांचे उत्तर(Answers to questions) छत्रपती शिवाजी महाराज कृषी धोरणातूनच सापडतात.परंतु आपले दुर्दैव आहे कि जगासमोर त्यांचे शेतीविषयक विचार(Agricultural Thoughts) समोर जाण्यास आपण कमी पडलो.

शेती(Agriculture) करणे हे रयतेचे मुख्य बलस्थान आहे ते त्यांनी जाणले होते.संपूर्ण प्रजेचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे याची महाराजांना जाणीव होती.
शेती हे केवळ जीवनावश्यक साधन नसून,रयतेच्या उत्पन्नाचे स्त्रोत आहे. शेती पिकले तर रयत सुखी,रयत सुखी तर राजा सुखी'(If agriculture is ripe, Rayat is happy, Rayat is happy and Raja is happy) हे सूत्र महाराजांना समजले होते.

पेरणीचे कामे आटोपल्यावर संरक्षणासाठी रयत सज्ज होत त्याकाळी नांगरणी,कुळवणी व नुसत्या शेणखतावर शेती पिकत असे. बिघा,पाचर आदी शब्द शिवचरित्रामधील आजही वापरले जात आहेत.तसेच कोणत्या जमिनीत कोणते पीक घ्यावे त्याचे पत्रकही तयार केल ,यालाच पीक पाहणी असे म्हणतो. शिवकालापासून हा शब्द प्रचलित आहे.ब्रिटिश शासनाने(British Rule) या पद्धतीची नकल केली आहे.कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी हे अस्मानी संकट रयतेवर कोसळत असत. त्यामुळे महाराजांनी कधीच सारा(TAX) वसुल केला नाही. प्रजेची,शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या सावकार,व व्यापाऱ्यांना त्यांनी समज दिला होता, याची माहिती काही ऐतिहासिक पत्रांतून मिळते.

त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज रयतेच्या पाठीशी नेहमी उभे होते महाराज. त्यावेळेस जे महाराजांनी शेतीविषयक धोरण आखली ती आजही आपल्याला प्रेरक आणि मार्गदर्शक आहे. शिवरायांनी त्यावेळेस शेतीविषयक बरेच कार्य केले त्या काळात शेती मोजली शेतीमोजणी हा प्रकल्प राबला. तर बरेच लोक म्हणतील जमिनी मोजल्या त्यात मोठे काय, म्हणजे काय ? तर स्वराज्याची सम्पूर्ण जमिनीची मोजणी हि शिवरायानी त्या काळी केली. आणि शेतकरी लागवड, मशागत असेल त्याची नोंद महालेकरी दफतरी यात असायची.

त्या काळी जमीन मोजण्याची पद्धत कशी असत –
एक काठी असायची ती काठी ५ हात व ५ मुठी लांब असायची अश्या २० काठ्यांचा बिघा असत, व अश्या १२० बिघ्याचं चावर असत. अश्या पद्धतीने शेतजमीन मोजण्याचे काम त्याकाळी शिवरायांनी केलं.

 

महत्वाच्या बातम्या –