‘पुणे – मुंबई’ या दोन शहरांना वाढला कोरोनाचा धोका ; मास्क वापरा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोरोना संसर्ग(Covid infection) रोगाने दोन वर्ष संपूर्ण जग थांबवले होते, आता कुठे सर्व व्यवस्तीत सुरु असून पुन्हा एकदा धोक्याची बातमी समोर आली आहे. कोरोनाचे रुग्ण(Covid) हे संथगतीने वाढत असून मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत(Cabinet meeting) आवाहन केले कि सर्व नागरिकांनी मास्क वापरावेत.

महाराष्ट्र राज्याचा आठवड्याचा संसर्ग(infection) दर हा १.५१ टक्के आहे मुबई व पुणे या शहरात अधिकचा संसर्ग(infection) दर आढळत असून मुंबई येथे ५२.७९ टक्के वाढ झाली असून ठाणे – २७.९२ पालघर – ६८.७५ तर रायगड – १८.५२ टक्के एवढी वाढ कोरोना रुग्णात झाली आहे. सध्या राज्यात ९२ टक्के लोकांना एक डोस दिला असून नागरिकांना दोन्ही डोस पूर्ण करावेत असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले व चाचणी तसेच लसीकरणाचा(Vaccination)वेग वाढवावा असेही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –