🕒 1 min read
मुंबई – राज्यात २०२१-२२ मध्ये १४ डिसेंबर २०२१ पर्यंत तब्बल १८५ साखर कारखाने (Sugar factory) सुरु झाले आहे. राज्यातील साखर उत्पादनात चांगलीच वाढ झाली आहे. तर ९२ खासगी व ९३ सहकारी तसेच साखर कारखान्यांचा (Sugar factory) समावेश आहे. तर राज्यातील सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने सुरु झाले आहे. तर राज्यातील सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत ४३ साखर कारखाने सुरु झाले आहे. आतापर्यंत राज्यात जवळपास ३३०.८९ लाख टन उसाचे गाळप करण्यात आले आहे.
राज्यात १४ डिसेंबर २०२१ पर्यंत तब्बल ३१०.३ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन (Sugar production) झाले आहे. अशी माहिती आयुक्तालयाकडून मिळाली आहे, तर यामुळे राज्यातील साखर उताऱ्यात चांगली वाढ झाली असून आता राज्याचा सरासरी साखर उतारा ९.३८ टक्के इतका आहे.
राज्यातील सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने सुरु झाले आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये ४३ साखर कारखाने सुरु झाले आहे. तर राज्यातील सोलापूर जिल्ह्यामध्ये तब्बल ८० लाख १९ हजार लाख टन उसाचे गाळप झाले आहे. तर सोलापूर जिल्ह्यामध्ये ६६ लाख ९४ हजार लाख क्विंटल साखरेचे उत्पादन (Sugar production) करण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील साखर उतारा ८.४७ टक्के आहे.
महत्वाच्या बातम्या –
- राज्यातील 15 जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा मोठा फटका; तब्बल 1.36 लाख हेक्टरवर नुकसान
- चिंता वाढली! देशातील ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ
- …तर देशात दिवसाला १४ लाख कोरोना रुग्ण सापडतील – नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांचे वक्तव्य
- राज्यात कोणालाही वीज फुकट मिळणार नाही; वीजेचे बिल भरावेच लागेल – नितीन राऊत
- कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोठा दिलासा
- राज्यातील 15 जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा मोठा फटका; तब्बल 1.36 लाख हेक्टरवर नुकसान






