राज्यात गळीत हंगाम २०२१-२२ मध्ये ५६६ लाख क्विंटल साखर उत्पादन

मुंबई –  महाराष्ट्रात (Maharashtra) गळती हंगाम २०२१-२२ मध्ये तब्बल १९२ साखर कारखाने (Sugar factory) उसाचे गाळप सुरू. राज्यातील साखर उत्पादनात चांगलीच वाढ झाली आहे. तर ९७ खासगी व ९५ सहकारी तसेच साखर कारखान्यांचा समावेश आहे. आतापर्यंत राज्यात १९२ साखर कारखान्यांकडून ५७३ लाख टन उसाचे गाळप  करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात तब्बल ५६६ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन (Sugar production) झाले आहे. अशी माहिती आयुक्तालयाकडून मिळाली आहे, तर  यामुळे राज्यातील साखर उताऱ्यात चांगली वाढ झाली असून आता महाराष्ट्राचा सरासरी साखर उतारा ९.८६ टक्के इतका आहे.

तर राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तब्बल १३४ लाख ७६ हजार लाख टन उसाचे गाळप (Sugarcane flour)झाले आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये १५० लाख ६८ हजार लाख क्विंटल साखरेचे उत्पादन (Sugar production) करण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील साखर उतारा ११.२१ टक्के आहे.

महत्वाच्या बातम्या –