मुंबई – हवामान विभागाने दिलेल्या माहिती नुसार राज्यात या महिन्यात अनेक भागांमध्ये अवकाळी पावसासह (Untimely rain) गारपिटीने हजेरी लावली. ५ ,६,७,८,९,१० जानेवारीला राज्यातील अनेक भागात पाऊस पडला, या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर या पावसामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या अवकाळी पावसासह सर्वाधिक फटका चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. जिल्ह्यात मागील दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते, तर काही ठिकाणी गारपीट व अतिवृष्टी झाली. अवकाळी पाऊस व गारपिटीने खरीप व रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी मदतीची मागणी केली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात अवकाळी पाऊस (Untimely rain) व गारपिटीने खरीप व रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कापूस, तूर, हरभरा, गहू, ज्वारी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. गोंडपिपरी, जिवती, कोरपना, पोंभुर्णा, मूल, भद्रावती, वरोरा, राजुरा, नागभीड व ब्रह्मपुरी या तालुक्यांत अवकाळी पावसाने शेतातील पिकांचे नुकसान झाले. याची दखल राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी घेतली असून, विदर्भातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे निर्देश दिले.
जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे (Untimely rain) गहू, तूर, ज्वारी, चना या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी झालेल्या नुकसानाची त्वरित पंचनामे करावे, असे निर्देश मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहे.
महत्वाच्या बातम्या –
- राज्यात थंडीचा कडाका वाढला; ‘या’ जिल्ह्याचा तापमानाचा पारा 7 अंशावर
- महाआवास अभियानाच्या लाभासाठी जिल्ह्यात मोहिम राबवा – जयंत पाटील
- सकाळी रिकाम्या पोटी गरम पाणी पिण्याचे ‘हे’ फायदे
- काळजी घ्या! देशात गेल्या २४ तासात 2 लाख 68 हजार 833 कोरोनाबाधितांची नोंद
- जिल्हा वार्षिक योजना वर्ष २०२२-२३ यासाठी 308 कोटी 40 लाखाच्या रुपयाच्या प्रारुप आराखड्यास मान्यता