लातूर – जिल्हयामध्ये आंबा पिकाचे क्षेत्र मोठया प्रमाणात आहे आंबा पिकावर विविध रोगाचा प्रादुर्भाव आढळुन येतो या किड व रोगामुळे होणारे नुकसान कमी करणेसाठी वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे .या साठी जिल्हयमध्ये चाकुर , औसा , उदगीर, व लातुर या तालुक्यामध्ये कृषि विभागामार्फत आंबा पिकावरील किड व रोगाचे नियतीपणे सर्वेक्षण करण्यात येत आहे या सर्वेक्षणाच्य आधारे पिक संरक्षक उपयायोजना प्राप्त होतात .
सध्यपरीस्थीतीमध्ये आंबा पालवीवरील तुडतुडयांचा प्रादर्भाव आढळुन आल्यास थायोमेथॉक्झाम २५ टक्के १ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. आंबा पालवीवरील फुलकिडयांनी आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यास थायोमेथॉक्झाम २५ टक्के २ ग्रॅम प्रति १०लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
आंबा बागांमध्ये भुरी व करपा रोगांच्या प्रादुर्भावाची शक्यता आहे. भुरी रोगाच्या व्यवस्थापनासाठी ५ टक्के हेक्झाकोनॅझोल ५ मि.ली. किंवा पाण्यात विरघळणारे ८० टक्के गंधक २० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून वापरावे. करपा रोगाच्या व्यवस्थापनासाठी कार्बेडॅझीम १२% + मॅन्कोझेब ६३% १० ग्रॅम प्रती १० लि. पाण्यातून फवारणी करावी असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी लातूर यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.
महत्वाच्या बातम्या –
- मराठा आरक्षणाविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना लिहिणार पत्र
- राज्यातील 6 जिल्ह्यांना बर्ड फ्ल्यूचा धोका, ‘या’ जिल्ह्यातील 80 हजार कोंबड्या मारण्यात येणार
- ‘हे’ उपाय करून पाठदुखी मिनिटांत दूर करा, माहित करून घ्या
- केंद्राने शेतकऱ्यांचे हे आंदोलन योग्यप्रकारे हाताळले नाही – जयंत पाटील