Share

राज्यात गळीत हंगाम २०२१-२२ मध्ये एकूण १८६ साखर कारखाने सुरू

Published On: 

राज्यात गळीत हंगाम २०२१-२२ मध्ये एकूण १८६ साखर कारखाने सुरू

🕒 1 min read

मुंबई – राज्यात २०२१-२२ मध्ये १६ डिसेंबर २०२१  पर्यंत तब्बल १८६ साखर कारखाने (Sugar factory) सुरु झाले आहे. राज्यातील साखर उत्पादनात चांगलीच वाढ झाली आहे. तर ९२ खासगी व ९४ सहकारी तसेच साखर कारखान्यांचा (Sugar factory) समावेश आहे. तर राज्यातील सोलापूर जिल्ह्यात  सर्वाधिक साखर कारखाने सुरु झाले आहे. तर राज्यातील सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत ४३ साखर कारखाने सुरु झाले आहे. आतापर्यंत राज्यात जवळपास ३४७.६२ लाख टन उसाचे गाळप करण्यात आले आहे.

राज्यात १६ डिसेंबर २०२१  पर्यंत तब्बल ३२७.१ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन (Sugar production) झाले आहे. अशी माहिती आयुक्तालयाकडून मिळाली आहे,  तर  यामुळे राज्यातील साखर उताऱ्यात चांगली वाढ झाली असून आता राज्याचा सरासरी साखर उतारा ९.४१ टक्के इतका आहे.

राज्यातील सोलापूर जिल्ह्यात  सर्वाधिक साखर कारखाने सुरु झाले आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये ४३ साखर कारखाने सुरु झाले आहे. तर राज्यातील सोलापूर जिल्ह्यामध्ये तब्बल ८३ लाख ९५ हजार लाख टन उसाचे गाळप झाले आहे. तर सोलापूर जिल्ह्यामध्ये ७१ लाख ३६ हजार लाख क्विंटल साखरेचे उत्पादन (Sugar production) करण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील  साखर उतारा ८.५० टक्के आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
बातम्यासाखर (Sugar)

Join WhatsApp

Join Now
राज्यात गळीत हंगाम २०२१-२२ मध्ये एकूण १८६ साखर कारखाने सुरू

🕘 संबंधित बातम्या