Share

मोठी बातमी – राज्य मंत्रिमंडळाने ‘हे’ घेतले महत्वाचे निर्णय !

Published On: 

🕒 1 min read

मुंबई – राज्य मंत्रिमंडळाची(Cabinet)आज दिनांक २६ रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. कोरोना(Covid) महामारीनंतर तसेच अनेक प्रश्न रखडले होते /प्रलंबित होते त्यातील महत्वाच्या प्रश्नांवर आज निर्णय घेण्यातआले.

राज्य मंत्रिमंडळणारे(State Cabinet) हे घेतले महत्वाचे निर्णय –
१ ) टँकरद्वारे पाणीपुरवठा – महाराष्ट्रातील धरणात ३६.६८ टक्के एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे(Water is available), सध्या पाणी नसलेल्याभागात ४०१ टँकर्स उपलब्ध असून तेथे पाणीपुरवठा करण्यात येतो,कोणत्या भागात किती टँकर्स आहेत याचा आढावा घेण्यात आला.

२ ) मराठा – कुणबी समाजाचे वसतिगृह विकसित केले जाणार – सारथी संस्थेला नवी मुंबई येथील खारघर येथे सेक्त्टर ३२ मधील ३५०० चौमी क्षेत्रफळ भूखंड देण्यात येणार आहे असा राज्य मंत्रिमंडळाने(State Cabinet) निर्णय घेतला आहे, मराठा तसेच कुणबी समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक उन्नीती साठी सारथी संस्थेची स्थापना झालेली आहे. सारथी संस्थेमार्फत रजत अनेक सुविधा उपलब्ध जाणार आहे.

३ ) मुख्यमंत्र्यांनी(CM) केले मास्क(Mask)वापरण्याचे आवाहन –
राज्यात पुन्हा कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे असा आकडा सांगतो, मास्कसक्ती नसली तरी सर्वानी मास्क वापरावा असे आवाहन मुख्यमंत्रीनी जनतेला केले आहे. मुंबई – पुण्यात पुन्हा एकदा पॉसिटीव्हिटी जास्त प्रमाणात आढळत आहे.सध्या केवळ एक रुग्ण व्हेटिलेटरवर असून 18 रुग्ण ऑक्सिजनवर आहे. रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या कमी असली तरी कोरोना(Covid) पूर्णपणे गेलेला नाही हे लक्षात घेऊन सर्वांनी सावधगिरी बाळगणे आणि त्यासाठी मास्क घालत राहणे, लस घेणे आवश्यक आहे

४ ) हरभरा हमीभाव बाबत केंद्रांना मुदतवाढ – ह्यावर्षी हरभरा उप्पनात वाढ(Increase in yield) झाली असून महाराष्ट्रात ३२.८३ लाख मेट्रिक टन उत्पादन अपेक्षित होते परंतु यंदा ८.२० लाख मेट्रिक टन वाढीव उत्पादन(Production) झाले असून हरभरा खरेदीसाठी हमीभाव केंद्रांना २८ जूनपर्यंत मुदतवाढ देण्याची विनंती राज्याने केंद्र सरकारकडे केली आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
बाजारभाव (Market Prices) बातम्या (Main News)

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon

🕘 संबंधित बातम्या