Share

पावसाळ्यात हे पदार्थ खाणे टाळावे …

Published On: 

पावसाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. उघड्यावरचे पदार्थ खाल्याने जंतू संसर्ग, ताप यासारख्या तक्रारी निर्माण होतात. त्यामुळे या दिवसात काही पदार्थ खाणे टाळावे. अनारोग्य निर्माण करणारे उघड्यावरचे पदार्थ खाल्याने जंतू संसर्ग, ताप यासारख्या तक्रारी निर्माण होतात.

* या दिवसात सॅलेड खाणं टाळावं.
* पावसाळ्यात वातावरणात ओलावा असल्याने हिरव्या पालेभाज्यांमध्ये बॅक्टेरियांची वाढ होते. त्यामुळे पालेभाज्या खाणे टाळल्या पाहिजेत.
* कापल्यानंतर फळं लगेच खावीत. हवेशी संपर्क झाल्याने फळांमध्ये बॅक्टेरियांची वाढ होते.
* पावसाळ्यात पचनशक्ती मंदावते. त्यामुळे तेलकट, तळकट पदार्थ खाऊ नयेत.
* पावसाळ्यात भात खाल्ल्याने अंगावर सूज येण्यासोबतच पोट फुगतं. त्यामुळे भात प्रमाणात खावा.
* मीठामळे पोट फुगतं आणि भूक जास्त लागते. त्यामुळे या दिवसात मीठही कमीच खावं.
* पचनास जड असणार्‍या फ्लॉवर, कोबीसारख्या भाज्या खाऊ नयेत.
* दह्यामुळे कफ होतो.
* शीतपेयांमध्ये शरीरातल्या खनिजांचं प्रमाण कमी होऊन पचनक्रियेवर परिणाम होतो.

बातम्या (Main News) विशेष लेख (Special Articles)

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon

🕘 संबंधित बातम्या