🕒 1 min read
मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी समाजाला २७ टक्के आरक्षण देता येणार नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यानंतर आज एसटी कर्मचारी संप आणि ओबीसी आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी राज्य मंत्रीमंडळाची बैठक होणार आहे.
ओबीसी आरक्षणाला (OBC Reservation) सर्वोच्च न्यायालयाने स्थिगीती दिल्यानंतर महाविकास आघाडी सरकारवर प्रचंड टीका होत आहे. विरोधकही आक्रमक झाले आहेत. याच पार्श्वभुमीवर राज्य मंत्रिमंडळाची आज महत्वपूर्ण बैठक होणार आहे. अशातच, आरक्षण नाही, तर मतदान नाही, असा निर्धार भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील ओबीसी मतदारांनी केला आहे. त्यामुळे ओबीसी नेत्यांचे मोठे नुकसान होणार आहे. यामुळे ओबीसी नेते या बैठकीत गदारोळ घालण्याची शक्यता आहे.
यासह राज्यावर ओढावलेले ओमायक्रॉनच्या (Omaycron) संकटावरही मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा होणार आहे. राज्यात ओमायक्रोनचे रुग्ण आढळल्यानंतर राज्यातील आरोग्य यंत्रणा अधिकच सतर्क झाली असून, हे संकट रोखायचे कसे आणि आणखी कशा पद्धतीच्या उपाययोजना कराव्या लागतील, यावर विस्तृत चर्चा होण्याची शक्यता आहे.
- ओमिक्रॉनचा कहर! राज्यातील ‘या’ जिल्ह्यात जमावबंदी लागू
- चिंता वाढली! राज्यात ओमायक्रॉन व्हेरिएंटनच्या रुग्णसंख्येत वाढ
- शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पंतप्रधान किसान योजनेचा 10 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार
- पशुसंवर्धन योजनांच्या लाभासाठी आता एकदाच अर्ज करा; मोबाईल ऍपद्वारे योजनांचा लाभ, प्रतिक्षा यादीचीही तरतूद
- शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम आठ दिवसात जमा करा – दादाजी भुसे
- राज्यातील ‘या’ जिल्ह्यात ओमिक्रॉनचा कहर; ‘इतके’ रुग्ण आढळले






